मोबाइल,टीव्ही आणि इंटरनेट अशा तीनही माध्यमांतून संपर्कक्रांती होत आहे.यंत्रणेचा सकारात्मक वापर होत होता तोवर ठिक होते.गेल्या काही दिवसात देशात धार्मिक,जातीय आणि प्रांतीय अस्मितेच्या अफवा पसरविल्याने देशात अशांतता प्रस्थापित केली.अफवा पसरवणे हे फार सोपे आहे.अशा अफवांमुळे मनात प्रचंड भीती निर्माण होते आणि माणूस ख-याखोट्याची शहानिशा न करता त्याच्या अधीन होतो.पटकन प्रतिसाद मिळविणे हा आजचा मंत्र असल्याने एसएमएस वा त्याला आधी म्हटलेले पर्याय यांनाच पसंती दिली जात आहे.मोबाइल या तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करुन लोकांच्या मनावर ताबा मिळविला होता.ही गोष्ट भयानक आहे आणि येणा-या संकटांची चाहूल देणारी आहे.
इंटरनेटचे फायदे सर्वांना माहीत आहेत,तोटे माहीत नव्हते,ते आता सर्वांना कळायला लागले आहेत.या संपर्काच्या साधनांचा भरपूर दुरुपयोग करून घेतला जात आहे.माहितीची देवाणघेवाण करणारी सगळीच शस्त्रे दुधारी आहेत हे आता सगळ्या जगाला कळून चुकले हे बरे झाले.
आपले सरकार फेसबुकला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचा आग्रह करत आहे.ट्विटरची बोगस अकाऊंट्स बंद करण्यासाठी सांगत आहे आणि एकूणच वेगवेगळ्या मार्गाने इंटरनेट सेन्सॉरशिप आणण्याचा प्रयत्न करीत आहे.वेबसाइट ब्लॉक करून अथवा ट्विटरची अकाऊंट्स बंद करून काहीही होणार नाही. टीव्ही , मोबाइल,इंटरनेटचा वापर करण्यात तारतम्य बाळगणे हाच त्यावरचा उपाय आहे. आज कोठेही दंगली झाल्या अथवा बॉम्बस्फोट झाले तर पहिल्यांदा मोबाइल नेटवर्क जॅम केले जाते.
भारतात मोबाइलचा आणि इंटरनेटचा वापर करणा-यांची संख्या अनुक्रमे ९० कोटी आणि १२ कोटींपर्यंत पोहोचली यामुळेच आपल्या देशात मोबाइल व इंटरनेट या सोप्या,स्वस्त आणि वेगवान संपर्कसाधनांमुळे अफवा वेगाने पसरतात.
अनिश्चिततेचे वातावरण हे अशा अफवा पसरण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण मानले जाते. जेव्हा अधिकृत किंवा विश्वासार्ह माहितीच्या स्रोताकडून पुरेशी माहिती येत नाही वा विसंगत माहिती पाझरत राहते तेव्हा माहितीच्या अनिश्चिततेचे वातावरण तयार होते. समाज वा लोकसमूह अशी अनिश्चितता फार काळ सहन करू शकत नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी मग हा समूह पूर्वग्रहांवर आधारित अंदाज बांधायला लागतो. अपुऱ्या माहितीच्या आधारे रचलेल्या कथा मग ही माहितीची पोकळी भरून काढायला लागतात. त्यातच घडलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनांचे परिणाम हिसंक वा नुकसानकारक असेल तर अनिश्चिततेसोबतच अस्वस्थता आणि तणाव वाढू लागतो. अशा परिस्थितीचा आणि विश्वासार्ह स्रोताच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत मग हितसंबंधी गट त्यांच्या सोयीची पण तितकीच अपुरी कथा रचतात. त्यावर लोकांचा विश्वासही बसू लागतो आणि माहितीला किंवा कथेलाही किमान स्वीकृती मिळाली की तिचा प्रसार वेगाने व्हायला लागतो. विखारी आणि द्वेषमूलक अफवांसंबंधीच्या अनेक अभ्यासांमधून अफवांची ही थिअरी सिद्ध झाली आहे.अफवांच्या संपर्कात येण्याचा, त्याला बळी पडण्याचा आणि त्या पुढे सरकविण्यात कळत नकळत सामील होण्याचा धोकाही अनेक पटीने वाढतो. इतकेच नव्हे तर इंटरनेटवर मिळणा-या अनामिकतेमुळे अफवा पसरविणा-यांना पकडणेही अवघड होऊन बसते.
शहरातील विविध समुदायांचे असे आपल्यातच आक्रसत जाणे हे चिंताजनक आहे. शहरी ताणतणाव, हितसंबंधी गटांचे राजकारण, विश्वासार्ह वाटाव्या अशा शक्तींचा -हास, वाढत्या संपर्कशक्यता आणि आक्रसणारे समुदाय यामुळे अफवांचे पीक भविष्यात मोठय़ा प्रमाणावर येण्याची भीती आहे.अफवा आणि त्याचे झालेले परिणाम म्हणूनच माहितीचा अपघात न ठरता धोक्याचा इशारा ठरत आहेत.
इंटरनेटचे फायदे सर्वांना माहीत आहेत,तोटे माहीत नव्हते,ते आता सर्वांना कळायला लागले आहेत.या संपर्काच्या साधनांचा भरपूर दुरुपयोग करून घेतला जात आहे.माहितीची देवाणघेवाण करणारी सगळीच शस्त्रे दुधारी आहेत हे आता सगळ्या जगाला कळून चुकले हे बरे झाले.
आपले सरकार फेसबुकला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचा आग्रह करत आहे.ट्विटरची बोगस अकाऊंट्स बंद करण्यासाठी सांगत आहे आणि एकूणच वेगवेगळ्या मार्गाने इंटरनेट सेन्सॉरशिप आणण्याचा प्रयत्न करीत आहे.वेबसाइट ब्लॉक करून अथवा ट्विटरची अकाऊंट्स बंद करून काहीही होणार नाही. टीव्ही , मोबाइल,इंटरनेटचा वापर करण्यात तारतम्य बाळगणे हाच त्यावरचा उपाय आहे. आज कोठेही दंगली झाल्या अथवा बॉम्बस्फोट झाले तर पहिल्यांदा मोबाइल नेटवर्क जॅम केले जाते.
भारतात मोबाइलचा आणि इंटरनेटचा वापर करणा-यांची संख्या अनुक्रमे ९० कोटी आणि १२ कोटींपर्यंत पोहोचली यामुळेच आपल्या देशात मोबाइल व इंटरनेट या सोप्या,स्वस्त आणि वेगवान संपर्कसाधनांमुळे अफवा वेगाने पसरतात.
अनिश्चिततेचे वातावरण हे अशा अफवा पसरण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण मानले जाते. जेव्हा अधिकृत किंवा विश्वासार्ह माहितीच्या स्रोताकडून पुरेशी माहिती येत नाही वा विसंगत माहिती पाझरत राहते तेव्हा माहितीच्या अनिश्चिततेचे वातावरण तयार होते. समाज वा लोकसमूह अशी अनिश्चितता फार काळ सहन करू शकत नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी मग हा समूह पूर्वग्रहांवर आधारित अंदाज बांधायला लागतो. अपुऱ्या माहितीच्या आधारे रचलेल्या कथा मग ही माहितीची पोकळी भरून काढायला लागतात. त्यातच घडलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनांचे परिणाम हिसंक वा नुकसानकारक असेल तर अनिश्चिततेसोबतच अस्वस्थता आणि तणाव वाढू लागतो. अशा परिस्थितीचा आणि विश्वासार्ह स्रोताच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत मग हितसंबंधी गट त्यांच्या सोयीची पण तितकीच अपुरी कथा रचतात. त्यावर लोकांचा विश्वासही बसू लागतो आणि माहितीला किंवा कथेलाही किमान स्वीकृती मिळाली की तिचा प्रसार वेगाने व्हायला लागतो. विखारी आणि द्वेषमूलक अफवांसंबंधीच्या अनेक अभ्यासांमधून अफवांची ही थिअरी सिद्ध झाली आहे.अफवांच्या संपर्कात येण्याचा, त्याला बळी पडण्याचा आणि त्या पुढे सरकविण्यात कळत नकळत सामील होण्याचा धोकाही अनेक पटीने वाढतो. इतकेच नव्हे तर इंटरनेटवर मिळणा-या अनामिकतेमुळे अफवा पसरविणा-यांना पकडणेही अवघड होऊन बसते.
शहरातील विविध समुदायांचे असे आपल्यातच आक्रसत जाणे हे चिंताजनक आहे. शहरी ताणतणाव, हितसंबंधी गटांचे राजकारण, विश्वासार्ह वाटाव्या अशा शक्तींचा -हास, वाढत्या संपर्कशक्यता आणि आक्रसणारे समुदाय यामुळे अफवांचे पीक भविष्यात मोठय़ा प्रमाणावर येण्याची भीती आहे.अफवा आणि त्याचे झालेले परिणाम म्हणूनच माहितीचा अपघात न ठरता धोक्याचा इशारा ठरत आहेत.
No comments:
Post a Comment