Monday, July 6, 2009

महाराष्ट्र टाइस्म-०६०७२००९.


Thursday, July 2, 2009

रेल्वे प्रवाशांनी गुन्हे करु नयेत.



आयत्या वेळी गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलणारी रेल्वे व पुलांवरील गदीर्तील धक्काबुक्कीचा अनुभव घेण्यापेक्षा रूळ ओलांडण्याचा धोका अनेक जण पत्कारतात.महीलाही यात मागे नसतात.वाढते रेल्वे प्रवासी व बहुसंख्य रेल्वे स्टेशनांवरील पुलांचा आकार पुर्वी सारखा पुरेसा वाटत नाही.रूळ ओलांडण्यामागे पूल चढण्याचा त्रास वाचवणे. घड्याळाची कट्यावर घावणार्या मुंबईत नेहमीच सर्वच रेल्वे प्रवाशी रूळ ओलांडतात. हा गुन्हा असुन देखील रेल्वे स्टेशनांच्या परिसरात सर्रास असंख्य लोक हा 'गुन्हा' करताना दिसतात.अपघातात जीव गमावण्याची वा अपंग म्हणून आयुष्य काढण्याची पाळी येऊ नये, यासाठी रेल्वेने रूळ ओलांडण्यास मनाई केली आहे आणि ती प्रवाश्यांसाठी हिताचीच आहे. पण हे बंधन न पाळण्यात 'अनैतिक' काही आहे, असे कोणालाच वाटत नाही आणि त्यामुळेच रूळ ओलांडणाऱ्यांकडे गुन्हेगाराच्या दृष्टीने कोणी पाहत नाही. दंड व तुरुंगवास ह्या शिक्षा कोर्टानेदिल्या आहेत.रेल्वे प्रशासनाने हा गुन्हा करणार्या तुरुंगवासाने काही जरब निर्माण करता येते का, हे आता आजमावून पाहिले जात आहे. नुकतेच एका प्रवाशाने तीन दिवस तुरुंगात काढले आणि या अनुभवानंतर आयुष्यात पुन्हा रूळ ओलांडण्याचे तो धाडस होणार नाही.कुटुंबावर होणाऱ्या त्याच्या विपरीत परिणामांची जाणीव करून देण्यासाठी प्रबोधनाचे खास प्रयत्न करून या वर्तनापासून लोकांना परावृत्त करण्यावर रेल्वेचा भर आहे.काही ठिकाणी समाज सेवक व संस्थारेल्वे रुळ ओळाडंणार्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन आपल्या कुटुंबासाठी तरी हा गुन्हा परत करु नका अशी विनंती करत आहेत. कुटुंबावर होणाऱ्या त्याच्या विपरीत परिणामांची जाणीव करून देण्यासाठी प्रबोधनाचे खास प्रयत्न करून या वर्तनापासून लोकांना परावृत्त करण्यावर रेल्वेचा भर आहे. वाढत्या अपघातांचा विचार करता प्रवाशांनी कोणीही समजावण्या अगोदर स्वत:हुन रुळ ओलाडंणे बंद केले पाहीजे. थोड्याश्या वेळेसाठी आयुष्यात मोठ्या जोखीमा का पत्करतात?

Friday, June 26, 2009

सोनुचे यश

मी सोनु ला फोन केला व तीच्या दहावीच्या निकालाची चौकशी केली. तीने आनंदाने ९३% मिळल्याची माहीती दिली.काही विषयातर पैकीच्या पैकी गुणांसाठी दोन तीने गुण कमी पडले आहेत. तिच्या ह्या आनंदात सहभागी होण्यास घरात कोणीच नव्हते. पण माझ्या फोनमुळे तिला खुप आनंद झाला. मनमोकळे करुन ती फोनवर रडली. मला खुप वाईट वाटले. मी तिला शांत करीत तिचे कौतुक केले.
सोनु लहान असताना तीचे वडिल तीच्या आईला व तिला सोडुन गेल्यानतंर काही दिवसांत आईने
स्वत:ला जाळुन घेतले होते आणि त्यातच तीचे निघन झाले.त्यानतंर तिचे संगोपन तिच्या काका
व काकुने केले.
सोनुने काकाच्या घरात राहुन घरातील कामे करुन व हाल सहन करीत अभ्यास केला.
अश्या या परीस्थितीत सोनुने शाळेच्या मदती शिवाय कोणाचीच मदत नसताना देखील तीने हे यश मिळविले आहे.
तिचे हे यश साजरे करायला जवळ कोणीच नव्हते. तिच्या आईबाबा आता असते तर तीला खुप आनंद झाला असता. तिने बरोबरच्या मुलांचे होणारे लाड व पालकांची मुलांसाठी चाललेली धावपळ पाहुन काय वाटले असेल? तिला कीती वाईट वाटले असेल?
यापुढे काका काकु तीचे शिक्षण बंद तर नाही ना करणार ही भीती तिला वाटत होती? तिला खुप शिकावयाचे आहे पण तिची ही इच्छा पुर्ण होईल ना?

Thursday, June 25, 2009

टाइम्स ऑफ ठाणे-१९०६२००९


Monday, June 22, 2009

बालकामगारंनी बनविलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घाला.



पाटी पेन्सिल हातात धरण्याच्या वयात, सवंगड्यांसमवेत बागेत रेंगाळण्याच्या काळात या चिमुकल्यांचे हात कमाई मिळण्यासाठी धडपडतात.लहान वयात अंगावर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्याने त्यांचे बाल्य कुस्करले गेले आहे.त्यांच्या शिक्षण, भविष्य आणि बदलाचा मार्गच खुंटत असल्याचे वास्तव स्वीकारायला हवे. त्यांची या दुष्टचक्रातून सुटका होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोवळ्या वयात केलेल्या अवजड कामांमुळे न भरून येणारी शारीरिक, मानसिक हानी होत असताना यावरचे उपाय मात्र त्रोटकच आहेत.त्यामुळेच बालवयातील या ओझ्यामुळे त्यांचे बाल्यच हरवते आहे.बालकामगार हा प्रश्न अधिकाधिकच गंभीर होत असताना राजकीय इच्छाशक्ती मात्र अपुरीच पडत आहे.बालकामगारांच्या शोषणाविषयी ज्या देशांतील नागरिकांत सजगता आहे, तेथे बालकामगारांचा वापर करणाऱ्या उद्योजकांच्या उत्पादनांवर स्वेच्छेने बहिष्कार घालण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असतो. भारतात मात्र अजूनही नागरिकांत एवढी संवेदनशीलता दिसत नाही. अनेक अवैध व्यवसाय आणि धंदे सुरू असताना येथे सर्रास आणि राजरोसपणे बालकामगारांचा वापर होत आहे. कमी पैशात अधिकाधिक काम करून देणारे यंत्र म्हणून या चिमुकल्या हातांकडे बघितले जाते आणि या बालकांचे आयुष्यच या दाहक विनाशाकडे वळते. काही अपघातातून बालकामगार बळी पडत आहेत. जुन्या काचेच्या बाटल्या धुऊन स्वच्छ करणे, तयार कपडे, पाणीपुरीच्या पुऱ्या, फरसाण तयार करणे, जरीकाम, लेदर वर्क, हॉटेल आणि खानावळींचा समावेश आहे. जरीकाम,गॅस भरण्याचे काम,फटाक्यांच्या कारखान्यात, कापेर्ट इण्डस्ट्रीत बालकामगारांची संख्या वाढत आहे. उद्योगात मोठ्या प्रमाणावर छोटे हात राबत आहेत. बालमजुरीचे मूळ हे कमालीच्या दारिद्यात आहे आणि असंख्य बालकांना जगण्यासाठी मजुरीशिवाय पर्याय नाही या वास्तवाची त्यांना जाणीव आहे, हे यामागील मुख्य कारण आहे . बालमजुरी रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे करुन समाजात माफक जागरूकता निर्माण केल्याने बालमजुरीविरोधी चळवळ उभी केली तरच राज्यात बालकामगार मुक्त होतील.

Saturday, June 20, 2009

बालनाट्यांबाबत उदासिनता का?

गेल्या काही वर्षापेक्षा यंदाच्या नाट्यप्रयोगाना चागंला प्रतिसाद मिळाला आहे.लहान मुलांना नाटकांची गोडी लागून ती थियटरकडे वळावी आणि त्यांच्यावर संस्कार व्हावेत हा बाल नाटक़ांचा हेतू आहे.वेगळा विषयव माडंणी मुळे प्रयोगाना चागंला प्रतिसाद मिळ्त असला तरी शासनाकडुन मदत मिळत नाही. बालनाट्याबाबतीत सरकार नेहमीच उदासिन दिसत आहे.बालरंगभुमी हीच उद्दाच्या रंगभूमीचा पाया असल्याने शासनाने आर्थिक मदतीने मजबूत करावा व यापुढे मे व दिवाळीच्या सुट्टीतील बालनाटकांचेप्रयोग जास्तीत जास्त सादर करण्यास सरकारने पुढाकार घ्यावा. स्पर्धा भरविल्या जाव्यात.तरच नवे नाटककार तयार होतील. उन्हाळ्या सुट्टीत लहान मुलांसाठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करुन त्यात मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे ह्याचा सर्व खर्च सरकारने करावा. बाल नाट्याचा विकास व्हायचा असेल तर शालेय पातळीवर नाटकांचे शिक्षण दिलेपाहीजे. बालनाट्याची चळवळ सुरु होण्यासाठी जेष्ट् नाटककारांनी ह्या साठी प्रयत्न करावा.

Thursday, June 18, 2009

महाराष्ट्र टाइस्म-१९०६२००९.