Thursday, December 10, 2009

'ने मजसी ने'

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।

मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ ।

सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें ।

परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन ।

त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी ।

मी जगदनुभव-योगे बनुनी । मी तव अधिक शक्त उध्दरणी ।

मी येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला ।

सागरा , प्राण तळमळला शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं ।

ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती ।

दशदिशा तमोमय होती गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें ।

कीं तिने सुगंधा घ्यावें जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा ।

हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता ।

रे तो बाल गुलाबही आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला ।

सागरा , प्राण तळमळला नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।

मज भरतभूमिचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।

आईची झोपडी प्यारी तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा ।

वनवास तिच्या जरि वनिंच्या भुलविणें व्यर्थं हें आता ।

रे बहु जिवलग गमतें चित्ता । रे तुज सरित्पते । जी सरिता ।

रे तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।

सागरा , प्राण तळमळला या फेन-मिषें हससि निर्दया कैसा ।

का वचन भंगिसी ऐसा त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।

भिउनि का आंग्लभूमीतें मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ।

मज विवासनातें देशी तरि आंग्लभूमी-भयभीता ।

रे अबला न माझिही माता । रे कथिल हें अगस्तिस आता । रे जो आचमनी एक पळीं तुज प्याला ।

सागरा , प्राण तळमळला



स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद किनाऱ्यावर लिहिलेल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..' या काव्याला १० डिसेंबरला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटल्यावर एक कणखर व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येतं.


मातृभुमीच्या ओढीने त्याचा जीव तळमळत असताना या कवितेचा जन्म झाला.त्यानी त्याच्या अंर्तमनातील वादळ या काव्यात व्यक्त केला होता.
आपल्या देशात ' एकाच परिवाराने ' बलिदान केल्याचे सतत बोलले जाते , सावरकर आणि चापेकर परिवाराने बलिदान केले नाही काय ? पण नाही , त्यांच्या या आहुतीला आपण खरंच सन्मान केलाय का ? प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारुन पाहायला हवा.

या निमित्तने स्वा.सावरकरांच्या साहित्याशी निगडित संस्था व सेवा केंद्रे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत.पण त्यांच्या विचारांचे अनुकरण होताना दिसत नाही यांची खंत वाटते.

थोर स्वातंत्र्यवीर सावरकारांना त्रिवार अभिवादन.

Monday, December 7, 2009

मुस्लिमाचा सहभाग उल्लेखनिय.

ठाण्यात २६/११ ला परिवर्तन प्रतिष्टान संख्येने 'भारतीयांसाठी देतात रक्त,तेच खरे देशभक्त' या उक्तीचा प्रत्यय या उपक्रमातुन दाखवुन दिला.देशात खुप ठीकाणी रक्तदान शिबीरे भरवली गेली पण या शिबीरात रक्तदान करणा-या १४८ पैकी १०४ जण मुस्लिम समाजाचे होते हे विशेष! या कार्यक्रमाचा वृतांत पाकिस्तान दुतावासापर्यत पोहचला पाहिजे.समस्त भारतीय एक आहोत हे त्याना कळले तरच त्यांचे धार्मिक भावना भडकवुन आपल्याएकात्मतेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न बंद होतील.
देशात मुस्लिम लोकसंख्या मोठया प्रमाणात असुन स्वातंत्र्य मिळुन एवढी वर्षे होउनही आतापर्यत एकहीमुस्लिम पंतप्रधान कसा मिळाला नाही.देशाच्या राजकारणात मुस्लिमांचे प्रमाण अत्यल्प असल्याने तेवाढवण्याचे प्रयत्न मुस्लिम समाजने केले तरच समाजचे अनेक प्रश्न सुट्ण्यास मदत होईल.राजकारणातला मुस्लिमांचा सहभाग वाढल्यास त्यांच्या नेत्यांच्या नेतृव्तांवर ते पहीला पात्र मुस्लिम पतंप्रधान देउ शकतातअसे राहुल गांधी चे म्हणणे आहे.
देशात दहशतवादी कारवाया करणा-या संघटनांचा देशातील इस्लामिक संघटना जाहीर निषेध व विरोध करताना दिसत नाहीत असा भारतीय जनतेचा आरोप आहे.त्यामुळे हे भीषण हल्ले करण्याचे घाडसह्या मुस्लिम दहशतवादी करु शकतात.देशातील सर्व मुस्लिम संघटनांनी एकत्र येउन दहशतवादी कारवाया उधळुन लावण्यात गुप्तचर यत्रंणेला सहाय्य केल्यास दहशतवादावर अंकुश बसेल व देशात शातंता प्रस्थापित होईल.
दहशतवादाच्या विरोधात असेच मुस्लिमानी समाजात प्रबोधन करुन समाजाने ऐक्य दाखविणे गरजेचे आहे.
खरे युध्द हे दहशतवादाशी नसून आपल्या धर्माध व जातीय वृतीशी आहे.जन बदलावे असे वाटत असेलतर प्रथम आपण बदलेले पाहिजे.'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' तरच अतंर्गत कलह कमी होतील.

Thursday, December 3, 2009

अनिवासी भारतीयानी मायदेशात परतावे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जगभर पसरलेल्या लाखो अनिवासी भारतीय मंडळींना मायदेशी परतण्याचे आवाहन ह्ल्लीच केले आहे. शिवाय मायदेशात परतल्याचे असंख्य लाभ एनआरआयना मिळतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आपल्या देशाचा विकास हा बड्या देशांच्या तुलनेत थोड्या धीम्या गतीने सुरु आहे. देशात उर्जा, व्यापार, पर्यावरण आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील विकास प्रक्रियेला चालना देण्याची गरज आहे. विविध क्षेत्रात भारतीय बाजी मारताना दिसत आहेत.आपल्या देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्व जनतेबरोबर परदेशात राहणा-या मडंळीचा अनुभव नक्कीच उपयुत्त्क ठरु शकेल. एवढी वर्षे अन्य जिथे राहिलात तिथे आपल्या बुद्धी आणि कौशल्याचा वापर केलात, आता या ताकदीचा वापर मायदेशाच्या विकासासाठी करण्याची गरज आहे. यासाठी आपला निर्णय अगदी योग्यच ठरले अशी अनुकुल परीस्थीती निर्माण करण्याचे आश्वासनही पंतप्रधानांनी देत आहेत.


देश विकासाला हातभार लावण्याची इच्छा असणाऱ्या अनिवासी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना एकत्र आणण्याची गरज आहे.भारताने गेल्या काही वर्षांत आथिर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली असून त्यात अनिवासी भारतीय उद्योजकांनीही हातभार लावावा असे आवाहन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले आहे. दोन दशकांत भारतीय अर्थव्यवस्थेने साधलेली प्रगती व अर्थव्यवस्था सुधारण्याचा वेग पाहता येथील एनआरआय उद्योजकांनी त्यात सहभागी व्हावे अशी विनंती त्यानी केली आहे. अनिवासी भारतीय आणि भारतीय मूळ असणारे परदेशी नागरिक यांनी भारतात नवनवीन उद्योग काढावेत. अनेक अनिवासी भारतीय, नॉन रेसिडेन्ट इंडियन्स यंदा प्रकाशझोतात आले, त्यांनी भारताचं नाव जगाच्या नकाशावर कोरलंच, पण निवासी देशाचीही मान उंचावली.

हे अनिवासी भारतीय जर परत मायदेशात आले तर भारत जगात महासत्ता बनु शकते याची जगातील विकसित देशाना कल्पना आहे. पण आपले भारतीय भारतात येण्यास तयार दिसत नाहीत.परदेशातील स्वच्छ वातावरणात राहणारे अनिवासी भारतीय भारतातील अवाढव्य लोकसंख्या,गर्दी,वाहतुक वअस्वच्छते बद्द्ल नाके मुरडत आहेत. सरकारी कामात पारर्दशकता नसल्याने ते भारतात येऊन उध्योग धंदे सुरु करण्याचा विचार करण्याचे धाडस करीत नाहीत. याना आपले सरकार मायदेशात परतण्याचे आवाहन करीत आहे पण या त्यांच्या अडचणींवर काही तोडगा सरकार काढु शकेल का? इथले कायदे कडक आहेत,भ्र्ष्टाचार,संथ कार्य पध्दती मुळे त्याना प्रस्थापित होण्यास खुप मोठा अवधी लागेल या कारणासाठी ही मडंळी भारतात येण्यास तयार नाहीत असे वाचण्यात आले आहे. आपले सरकार याना काही सवलती देण्यास तयार असल्यास त्याला जाहीर प्रसिध्दी दिल्यास भारतात येऊन प्रयत्न करण्याचा विचार करतील.हे अनिवासी भारतीय मायदेशात परतले तर आपण बलवान होउन जगावर राज्य करु.


Monday, November 23, 2009

'गोली' एक वर्षाची.

'हँपी बर्थ डे टू गोली' तिच्या वाढदिवसाला आता काही दिवस उरले आहेत. कोण ही गोली? मुबंईवर हल्ला करणारे अतिरेकी कसाब आणि त्याचा साथीदार कामा हाँस्पिट्लमघ्ये शिरले असताना या गोडंस मुलीचा जन्म झाला. बदुंकीच्या गोळ्याच्या वर्षावात तिचा जन्म म्हणुन चव्हाण दाम्पत्याने खरोखरंच या मुलीचे नांव 'गोली'ठेवले. ही गोड मुलगी सर्वाची लाडकी आहे.
२६ नोव्हेबंरच्या रात्रीचा थरार आजही चव्हाण दाम्पत्याच्या डोळ्यादेखत उभा राहतो. २६ नोव्हेबंरच्या रात्री आठ वाजंता विजुला चव्हाण याना वेदना होऊ लागल्या नतंर त्याना कामा हाँस्पिट्लमघ्ये दाखल केले गेले. वेदना वाढल्यामुळे पत्नीला लेबर वाँर्ड्मघ्ये नेण्यात आले. डाँक्टरानी सांगितलेले औषध आणण्य़ास बाहेर पड्ले तेव्हा लोक सैरावैरा धावत होते.काय चालले आहे. याची चव्हाणाना कल्पना नव्हती. कामा हाँस्पिटलमघ्ये अतिरेकी शिरले आहेत याची कल्पना तोपर्यत हाँस्पिटलच्या कर्मचा-याना आली होती. पण रुग्णांच्या नातेवाईकांना काहीच माहीत नव्ह्ते. तिकडे पत्नीच्या वेदन वाढल्या होत्या. त्याच वेळेला डिलीव्हरी रुमच्या खिडकी बाहेर गोळीबार सुरु झाला होता. सर्व रुग्ण खाटांखाली लपले होते. त्याच धावपळीत या मुलीचा जन्म झाला. अतिरेक्याच्या गोळीच्या वर्षावात आपण सर्व मारले जाऊ नयेत, पण मृत्युची वाट पाहण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबांना वाचवण्यासाठी काही तरी केले पाहीजे यासाठी सर्वाची धावपळ सुरु होती. वाँडमघ्ये अतिरेकी शिरु नयेत म्हणुन लोखंडाच्या वस्तु आडोसे वाँडच्या दारात लावून शातंता होण्याची वाट पाहत होते. अतिरेकी गेल्याचे कळल्यानतंर घाबरत घाबरत बाहेर आले. लपुन बाहेर पडलेले चव्हाण याना मुलगी झाल्याचे कळल्यानतंर जो आनंद झाला त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. अतिरेक्याच्या हल्ल्यातून सर्व मडंळी सुखरुप असुन मुलीचा जन्मही व्यवस्थित झाला याचा हाँस्पिटलमघ्यले सर्व रुग्ण व कर्मचा-याना मोठा आंनद झाला. या मोठ्या सकंटातून सुखुरुप बाहेर पड्लेल्याच्या त्याच्या जीवनातला हा सर्वात मोठा आनंद ठरला होता. तिचा हा पहीला वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
ह्या हल्ल्यात काही शहीद झाले तर काही जन्माला आले. कोठे दु:ख तर कोठे सुख दिसते. पण सामान्य जनताच याच भरडली जाते.

Sunday, November 22, 2009

२६/११ हा एक सण.

मिडियावाले हा सण साजरा करीत आहे.
त्या ह्ल्ल्यास एक वर्ष पूरे होत आहे.
असुरक्षित मुबंईकरांच्या शेजारी दहशतवाद आजही फिरत आहे.
शिक्षेशिवाय अजमल कसाब रजेशाही थाटात सुरक्षित आहे.
'शवा'कडून कोणता जबाब लिहून घेणार आहे.
सुरक्षिततेत फिरणारे गृहमंत्री पून्हा आले आहेत.
भारत-पाक चर्चा हे दुबळ्यांचे लक्षण आहे.
मिडियाचा टिआरपी वाढत आहे.
'सुरक्षा'या इडस्ट्रीचे शेअर वधारले आहे.
सुरक्षा व बचावकार्य करणा-या यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे.
हुतात्म्याचे बलीदान व्यर्थ जात आहे.
मरणा-यांच्या घराची राखरांगोळी झाली आहे.
अतिरेक्याची रोजच ईद दिवाळी चालू आहे.

आता मिडियावाले पुढच्या दहशतवादी ह्ल्ल्याची वाट पाहत आहे.

Wednesday, November 18, 2009

घातक अधंश्रध्दा.

झिंबाब्वेमध्ये त्या दरम्यान एड्स अक्राळविक्राळ वेगाने पसरत होता. याचं कारण अंधश्रद्धेमध्ये दडल्याचं ध्यानात आलं. एड्सग्रस्त पुरुषानं कुमारिकेशी संबंध ठेवले तर तो रोगमुक्त होतो, असा समज पसरला आणि कोवळ्या मुलींवर होणाऱ्या बलात्कारांचं प्रमाण वाढलं. हजारो मुली देशभर बळी पडू लागल्या. यातनं अगदी रांगत्या मुलीही सुटल्या नाहीत. अशा मुलींना कुटुंबातही आधार नसे. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जाई. समाजभयास्तव गप्प बसवलं जाई एवढंच नव्हे तर एड्सग्रस्त बाप बरा व्हावा म्हणून स्वत:च्या मुलीला त्याच्या दावणीला बांधणाऱ्या आयाही होत्या. यातून शरीर मनावरच्या जखमांबरोबर एड्सची भेटही मिळालेल्या मुली वर्ष सहा महिन्यात मरणाची वाट चालू लागायच्या.अंधश्रद्धा आणि वासनांमध्ये होरपळणाऱ्या असहाय्य मुलीना केवळ औषधोपचारच नव्हे तर त्या धक्क्यामधून बाहेर येण्यासाठी मानसोपचारही केले पाहीजे.

कीती भयान अवस्था आहे येथील जनतेची.कोणी ही अंधश्रध्दा पसरवली असेल? कशी माणसे असतात?आणि कशासाठी असेल? पण त्याचा त्रास समाजातल्या कोणत्या गटाला सहन करावा लागत आहे. या अधंश्रध्देने पुढची पिढी एड्स हा रोग घेऊनच जन्माला येणार आहे. कीती रोगी या अधंश्रध्देमुळे आजारमुक्त झाले आहेत? कीती रोगी या अधंश्रध्देमुळे आजारमुक्त झाले असतील? पण हा अन्याय असाच सुरु राहणार का?

Wednesday, November 11, 2009

रोहीतचा अंतिम निर्णय.

आँफिसमघ्ये असताना दुपारी नातेवाईकांने फोनवर 'रोहीत'चे रेल्वे अपघातात निधन झाले,एवढेच कळविले. ही वाईट बातमी एकुन मी सुन्न झालो.काय करायचे हे कळत नव्ह्ते.काहीच सुचेना. माझे आँफिसमघले सहकारी विचारु लागले.त्याना सांगितल्यावर सर्वजण हळहळले. वरीष्ठाना माहीती देऊन मी आँफिसमघुन निघून सरळ रोहीतच्या घरी पोहचलो.घरात त्याच्या आईचा आक्रोश ऐकवत नव्हता. खुपसे नातेवाईक जमले होते.शांत होते.प्रत्येकजण वेगेवेगळे सांगत होते.कोणालाच प्रत्यक्षात काय घडले याची माहीती नव्हती. काही वेळाने रेल्वेची पूर्तता झाल्यावर त्याची मृतदेह आणली.सर्व विधी झाल्यावर सर्वजण सांत्वन करुन निघुन गेले. पण त्या घरावर मात्र शोककळा पसरली.


रोहीत वीस वर्षाचा तरुण मुलगा इजिनीयरीग़ंच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. लहान असल्यापासून तो जास्त कोणात मिसळत नव्हता.त्याला मित्र मैत्रीणी नव्ह्त्या.तो मीतभाषी असून एकालकोंडा होता. त्याला विचारलेल्या प्रश्नाचे तो फक्त उत्तर देत असे.स्वत:हुन तो बोलण्यात पुढाकार घेत नव्हता. तो नेहमीच स्वत:च्याच विश्वात असायचा.मनासारखे झाले नाही की खुप चिडायचा.थोडे काही आई बरोबर संभाषण होते. लहान असल्याने आई त्याच्यात भोवती फिरत असायची.त्याच्या अशा वागण्याने त्याची आई काळजीत असायची. शिक्षणात तसा ठिक होता.बारावी नतंर त्यानेच दादासारखे इंजिनीयरींला जाण्याचे ठरविले. धावपळ करुन प्रवेश मिळविले व नतंर तो सेमिस्टर पार करीत गेला. पण तो अभ्यासात काही रमला नाही. अभ्यास करायचा म्हणुन करीत होता.प्रोफेसरशी कधी जमले नाही की काँलेजला जात नसे. काँलेजमघ्ये शेवटी शेवटी मात्र वेळेवर जायचा.तो कोणाकडे बोलत नसल्यामुळे तो काय विचारकरतो याचा थांगपत्ता लागू देत नव्हता. पण त्याच्या अडचणी कोणाजवळ बोलत नसल्याने त्याचे काय आणि कोठे बिनसले आहे ते कळत नव्हते. आई बाबा विचारल्यावर उडत उडत माहीती द्यायचा. त्यानी व काँलेजनी काँन्सिलिंग केले पण उपयोग झाला नाही. त्याची शरीरयष्टी चागंली होती.जाँगींग व स्विमिंग करायचा.बाबा त्याला नियमीत स्विमिंगला घेऊन जायाचे. दादा पुण्यात राहायचा पण त्याच्याकडेही तो केव्हा गेला नाहीकी काही गोष्टी शेअर केल्या नाहीत.दोन्ही काकांकडेही कधाही गेला नव्हता. आई बाबा त्याला जबरदस्तीने फिरायला न्यायचे. रोहीत च्या जडणघडणीवर त्याच्या आईबाबाचे बारीक लक्ष होते.तो त्याच्याकडेही तो कधी ओपन झाला नाही.त्याच्यात बदल होईल या आशेवर ते वेगवेगळे प्रयोग करीत असायचे.


असा हा रोहीत सर्वाना सोडून पुढे निघुन गेला. त्याच्या आईचे दुख: कघीही कमी होणारे नाही. त्याचे शिक्षण जर पुर्ण झाले असते तर एखादे वेळी त्याच्यात बदल होउन तो सुधारला झाला असता असे त्याच्या आई बाबाना आता वाटत आहे.त्याने स्वत:हुन सर्व विचारानिशी निर्णय घेऊन आपले आयुष्य संपविले आहे.मनाचा कमकुवतपणा त्याला कोणता निर्णय घेण्यास भाग पाडले व तो कोठे निघुन गेला. हा टोकाचा निर्णय कसा काय घेतला व घेण्यास प्रवृत झाला हा एक प्रश्न राहिला आहे.त्याला काय मोठे दुख: होते ते काय कोणालाच कळले नाही. असाला निर्णय घेण्यास त्याने मन त्याचे कसे काय खंबीर केले असेल याचे कल्पना करता येत नाही. सर्वाना गाफिल ठेवून हा अनपेक्षीत निर्णय त्याने घेतला आहे. असे करेल याची कोणालाच कल्पना नव्ह्ती.त्यानी सर्वाना फसवले आहे. एकवीस वर्षाच्या रोहितने आपले आयुष्य त्याला जगण्यासाठीचा पर्याय न मिळाल्याने व न मिळविल्याने संपविले आहे. त्याच्या आत्मास शांती मिळो.


Thursday, November 5, 2009

गर्भातच मुलींची हत्या

कोर्टाने मुबंईतील दोन महिला डाँक्टराना समाजविघातक प्रवृत्तीं स्त्रीगर्भाची हत्या रोखण्यासाठी केलेल्या या कायद्यांप्रमाणे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही 'गुन्हेगार' स्त्रिया आहेत, ही समाजाच्या द्दष्टीने संतापाची बाब आहे. पैशासाठी ही उच्च शिक्षित मडंळी कोणत्या थराला जातील याबद्दल कोणीच सांगु शकत नाही.डाँक़्टरी पेशाला ही मडंळी काळिमा आहेत. स्त्रीगर्भाची हत्या हा अत्यंत हीन आणि अमानुष गुन्हा आहे, ही भावना समाजात रुजवण्यात सरकार आणि नागरी समाजाला अपयश आले आहे. कायदा राबवणारी यंत्रणा ही याच समाजातून आलेली असल्यामुळे, गुन्हे नोंदवण्याचे आणि गुन्हेगारांना झटपट व कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.


गर्भात काही जेनेटिक विकृती वा जन्मजात शारीरिक दोष नाहीत ना, हे शोधणे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुकर केले. मात्र याचा वापर गर्भ मुलाचा आहे की मुलीचा हे जाणून घेण्यासाठी करण्यात आला आणि मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जाऊ लागला. गर्भावस्थेतच मुलींचे खून पाडण्यास तयार होणारे हे उच्चशिक्षित पालक व डॉक्टरच आहेत हेच आपले र्दुभाग्य आहे. केवळ पैशांसाठी त्यांनी घेतलेल्या या हत्येच्या सुपाऱ्याच होत्या. या सुपा-या मुलगी नको असलेल्या आईबापाकडून दिल्या जातात म्हणून दोघांच्याही गुन्ह्याचे स्वरूप सौम्य होत नाही. यामुळे देशातील स्त्री-पुरुषांच्या प्रमाणात कमालीची विकृती निर्माण झाली आहे.


गर्भातच निवडीचा अधिकार बजावून, या भवितव्यापासून मुलींना वाचवले जात आहे, असे म्हणणा-या विकृत शहाण्यांची संख्या कमी नाही. परंतु अशा व्यक्ती केवळ गर्भावस्थेच मारल्या जाणाऱ्या लक्षावधी मुलींच्याच गुन्हेगार नाहीत, तर अवघ्या मानवी जीवसृष्टीच्याही आहेत. गर्भलिंग निदान करून स्त्रीगर्भाच्या हत्येचा मार्ग डॉक्टरमंडळी मोकळा करीत असतात. समाजद्रोही डॉक्टर आणि आपल्याच मुलीचा गर्भातच जीव घेणारे शिक्षित व समृद्ध पालक समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवायला मोकळे असतात. कायदा कठोर करूनही शेकडो कोटींच्या या उद्योगात मंदीची चिन्हे नाहीत, याचे कारण स्त्रीगर्भाची हत्या हा अत्यंत हीन आणि अमानुष गुन्हा आहे.

Saturday, October 31, 2009

वन्यजीव संपत्तीवर भरभरून प्रेम करणारे प्राणीमित्र.

सर्पांचा मित्र म्हणजे शेतकरयाचा मित्र व पर्यावरणाचा रक्षण करणारा ठरला आहे. समाजात सापाबद्दल आजही समज-गैरसमज बरेच आहेत. साप डूख धरून राहतो, माग काढत येतो या पसरविलेल्या बातम्यांमुळे गावांतून व शहरातून सापाना नेहमीच मारले जाते. सर्पमित्रांमघले वन्यजीव संपत्तीवर भरभरून प्रेम करणारे सुनील रानडे वयाच्या अठरा-वीस वर्षांपासून साप वाचवण्याच्या मोहिमेत दाखल झाले होते. पण साप वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या सर्पमित्राचा मृत्यू नागदंशामुळे व्हावा यासारखे दुदैर्व नाही.

फणाधारी, दहाचा आकडा असलेला नाग, कुकरच्या शिटीच्या आवाजाप्रमाणे फुत्कारणारा घोणस, गुलाबी जिभेचा मण्यार, कोणत्याही क्षणी हल्ला करेल असा त्रिकोणी डोक्याचं फुरसं... महाराष्ट्रातील हे चारही विषारी साप मुंबई, ठाण्याच्या गजबजलेल्या वस्तीत आढळतात. त्यांना पकडण्यासाठी अनेकदा सर्पमित्रांना बोलवावं लागतं.

सापाची माहीती क़ळल्यावर, त्याला मारतील किंवा जखमी करतील या भितीने ते तडक ठीकाणी पोहचून काम फत्ते करीत असत. ऐवढी त्याना सापांबद्दल काळजी होती.सापांवर उपचार व देखभाल करायचे.

हजारो सापांची सुटका केल्यानंतर रानडेही सापांना सरावले होते. त्यामुळे मुंबईतल्या कोणत्याही ठिकाणी मिळालेला जखमी साप सुनीलकडे येत असे. सापाला सुनीलच्या हवाली केल्यावर सर्पमित्रही निर्धास्तपणे घरी जात.

सापांसाठी पार्क किंवा उपचार केंद तसेच सर्पमित्र संघटना उभारण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते.

या प्राणीमित्रांत काही गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींचा सुळसुळाट असल्याचा संशय आल्याने वनखात्याच्या आय कार्ड दिले आहेत. सर्पमित्रांनी पकडलेले साप जर त्यांच्या घरी सापडले अन् कोणी त्या बाबत गुन्हा दाखल केला तर, तो सर्पमित्र वन्यजीव कायदा १९७२ नुसार गुन्ह्यास पात्र ठरतो. त्याला शिक्षाही होते. आयकार्डचं कवचं या सर्पमित्रांकडे असेल तर त्यांना या गुन्ह्यातून अभय मिळेल.

सापांची काळजी घेताना अनेकदा दंश होतात, पण त्यामुळे मृत्यू ओढवण्याचे प्रमाण अत्यल्प तरीही वन खात्याने या सर्पमित्रांचा विमा उतरविला पाहिजे. सर्पमित्रही सामाजिक जबाबदारी म्हणूनच हे काम करत असल्याने त्यांना रोजगार देण्याची आवश्यकता आहे.

Sunday, October 25, 2009

महाराष्ट्र कर्जमुक़्त करावा.

महाराष्ट्राच्या सुर्वणमहोत्सवी वर्षातील ऐतिहासिक निवडणुक़ीत जनता आपल्या हातातील मतदानाच्या अधिकाराचा वापर करुन आपल्याला हवा असलेल्याच पक्षाला निवडुन निवडुन दिले आहे.सर्व पक्षांच्या उमेदवारानी या निवडणुकीत आचारसंहिता बाजुला सारुन अफ़ाट खर्च केला आहे.निवडुन आल्यानतंर व सरकार स्थापन केल्यानतंर हेच उमेदवार खर्च केलेला पैसा खोर्याने जमा करण्यास सुरुवात करतील. पक्षाने याच्यांवर नियंत्रण ठेवायला पाहिजे तरच पक्षाची प्रतिमा मळीन होणार नाही.

तेव्हा या निवडुन आलेल्या उमेदवारानी आपापसातला वादबाजूला सारुन व भ्रष्टाचाराला बळी न पडता आपण जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुतर्ता करण्याची आठवण ठेवून लोकोपयोगी कामे करावीत.महाराष्ट्रावरचे कर्ज सव्वा लाख कोटीच्यापुढे सतत वाढत आहे.महारष्ट्रावरचे कर्ज आणखी किती वाढविणार? काही नियोजन आहे का नाही?कोणताच पक्ष व राज्यकर्ते हे कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. पण आपल्या कारभाराच्या कालावधीत कर्जाच्या बोज्याचे आकडे वाढविताना दिसत आहेत.महाराष्ट्रासारख्या प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करणारे राज्य कर्जाच्या ओझ्यात अडकलेले आहे हे आम जनतेला खटकत आहे पण एकाही राज्यकर्त्याला याबद्दल काहीच सोयरेसुतक नाही.महाराष्ट्र राज्याने देशाला अनेक मंत्री दिले पण या मंत्र्यानी राज्याचे कर्ज कमी करण्याचा विचार केला नाही.सरकार स्थापन करणारया पक्षाने व प्रत्येक उमेदवाराने आपल्या कारभाराच्या कालावधीत राज्यातील इतर विकासासह महाराष्ट्राला कर्जमुक्त करण्याचा विडा उचललाच पाहिजे.
महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा ५० वषेर् पूर्ण होत आहेत अशा महाराष्ट्राला 'सुजलाम्-सफलाम्' होऊ शकेल. सरकारी तिजोरीवर किती भार पडेल, याची निरर्थक आकडेमोड करण्यात कागद व वेळ वाया न दवडता सर्वच आघाड्यांवर या प्रांताची अव्याहत पीछेहाट होत असलेल्या महाराष्ट्राच्या कर्जमुक्तीचा निर्णय लवकरच घेण्यात यावा.

'सकाळ' या वृतपत्रात २४ आँक़्टोबंर २००९ हि प्रतिक्रिया प्रसिध्द झाली आहे.