दोन चाकावर सपुर्ण जग फिरण्याचे स्वप्न सुरुवातीपासुन होते. काही तांत्रीक अडचणी आल्यामुळे मग कमीत कमी आपल्या भारत देश सायकलवर जवळुन पाहण्याचे ठरविले. त्यावेळेला वडाळा येथे बी. पी. टी. वसाह्तीत राहत होतो. वसाह्तीतले व बी.पी.टी.तले सहकार्यासह सायकल सफारीला सुरुवात केली. प्रथम घरातुन या छंदाला विरोध होतो. मित्राबरोबर प्रथम मुबंई ते बोर्डी एकादिवसात प्रवास केला.प्रवास करुन्र सुरक्षित घरी परतल्यावर आमच्यापेक्षा घरच्याना आनंद व विश्वास पटला.मग सफारीना जोरात सुरुवात झाली.भिरा-पाली ते मुबंई मी व मित्र अरविंद जागडे याच्यासोबत दोन दिवसात पुर्ण केली.थोडयाच दिवसात आलिबाग-मुरुड(जंजिरा)हि सफर तीन दिवसात पुर्ण केली.काही दिवसात आमचा नविन मित्रांसह एक ग्रुप तयार झाला.अकरा जणानी शिर्डी - औरंगाबाद सायकल सफारीचे आयोजन केले.प्रायोजकाच्या शोधात धावपळ सुरु केली.पोर्ट ट्रस्ट मघुन मदतीसाठी प्रयत्न केले.
सर्वाजण उत्साहानी कामाला लागले.बीपीटी हाँस्पिटलचे डिन श्रीयुत.भाजेकरांनी झेडा दाखवुन निरोप दिला.आम्ही नाशिक,शिर्डी,जायकवाडी,औरगांबाद,वेरुळ,खंडाळामार्गे अकरा दिवसानी सुखरुप मुबंईत परतलो.सत्कार झाल्याबरोबर पुढच्या कार्यक्रमाची आखणी सुरु केली.सत्कार झाल्याबरोबर पुढच्या कार्यक्रमाची आखणी सुरु केली.मी अरविंद जागडे,सुरेंद्र कोचरेकर,सुरेश सतांनम अशी चार जणाची टिम जमली.सत्कार झाल्याबरोबर पुढच्या कार्यक्रमाची आखणी सुरु केली.मी अरविंद जागडे,सुरेंद्र कोचरेकर,सुरेश सतांनम अशी चार जणाची टिम जमली.श्री.अष्टविनायकांच्या दर्शानाला सायकलवर जायचे ठरले.तेही फक्त अकरा दिवसात पुर्ण करण्याचे पक्के केले. खर्च खुप येणार म्हणुन प्रायोजकाची शोधाशोध करुन काही विशेष हाती आले नाही. आम्हालाच खाज असल्याने आपनच सर्व खर्च उचलायचे ठरविले.मार्गाच्या आखणी व वस्तु गोळा करुन तयारीला लागलो.सफरीचा दिवस जवळ येउ लागल्याने धावपळीला वेग आला.सायकलीचे साहीत्य,औषध,कपडे ई.वस्तु पाठीवर टाकुन व काही वस्तु सायकलवर अडकवुन घरच्याचा निरोप घेतला. पाली,महड,पुणे,जेजुरी,थेउर,मोरगाव,सिध्दटेक,ओझर,लेण्याद्री,राजंनगाव येथुन खंडाळामार्गे नउ दिवसातच दर्शन घेउन परतलो.पुर्वतयारी चांगली केल्यामुळे प्रवास सुरळीत व कमी त्रासाचा झाला.रोजच्या प्रवासाची माहीती रोज घरी ध्यायच्या अटिवरच सफारीला जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे आम्ही घरच्याबरोवर रोज सपर्कात होतो. घरची मंडळी त्यामुळे निर्धास्त होते.मैत्रीणी बरोबर वेगळा सपर्क ठेवला होता. चौघेच असल्याने प्रवास ठरलेल्या वेळेपेक्षा अगोदर पुर्ण करता आला. जंगी स्वागत झाले.'श्री'या साप्ताहिक मघ्ये आमच्या चौघाची मुलाखत प्रसिध्द झाली होती. ही आमची सफर एकदम स्मरणीय झाली.
थोडे दिवस विश्राती घेतल्या नतंर नविन सफारीची तयारी सुरु केली.मागच्या सफारीच्या अनुभवाने आत्मविश्वास वाढल्यामुळे राज्याच्या बाहेर जाण्याचा विचार आम्ही सुरु केला.चार ते पांच राज्यातुन प्रवास करीत नेपाळला जाण्याचे सर्वानी आग्रह घरला.प्रवासाचा खर्च,कालावधी,सफारीत भाग घेणारे सहकारी याचा आढावा घेण्यास सुरुवात झाली. मला सफारीचा प्रमुख बनवुन जबाबदरी खादयावर टाकली.खुपशी तयारी होत आली.पण एनवेळेला माझे लग्न जमले आणि सफारीच्या वेळेतच साखरपुडा ठरल्यामुळे मी लग्नाला महत्व देउन सफारीच्या कार्यक्रमातुन बाहेर पडलो. सर्व मित्रनाराज झाले.मला त्याना समजविण्यात खुप प्रयत्न मी केले.अरविंद जागडेला प्रमुख केले.मी मुबंईतुन त्याना मदत केली. सफारी काही अडचणी न येता चागंली पार पाडली. ही संधी गमवल्यामुळे मला खुप वाईट वाटले. सर्व मित्र ससांरात गुंतल्यामुळे आमचा उत्साह कमी होत गेला.वेळ,पैसा,रजा,ससांरातुन सुटटी या सर्व गोष्टीचा विचारकरुन जवळ जवळ या छंदातुन आम्ही पुर्णविराम घेतला. या छदांत सगळे परीसर अगदी जवळुन पाहता येतो.परदेशी वेडेउगाचच नाही सपुर्ण जग सायकलवरुन फिरतात.
सन १९८३ ते १९८६ या कालात मी या छंदात खुप आनंद उपभोगला.आजही त्याला प्रवासतील् गोष्टीची आठवण येते.
2 comments:
Very good! After reading through I felt that we have missed all this. Hope to join you for any further trek if you feel I also can do it.
Baloo Mulye
Very good! After reading through I felt that we have missed all this. Hope to join you for any further trek if you feel I also can do it.
Baloo Mulye
Post a Comment