Wednesday, December 23, 2015

धार्मिक वेडाचारापासून तरुणांनी दूर राहावे.


धार्मिक  वेडाचारापासून  तरुणांनी  दूर राहावे.


इराक, सीरियासह जगभरात रक्तरंजित हिंसाचार करणारी इस्लामी दहशतवादी संघटना  ’इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने पुणे शहरातील एका सोळा वर्षांच्या युवतीला आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. इसिसचा प्रभाव या मुलीवर येवढा वाढला होता की, त्यांच्यासाठी ती काहीही करायला तयार होती. तीने इसिसचा सांगण्यावरून तीचा पेहराव देखील बदलला होता. तसेच त्यांनी परदेशात बोलवले होते त्यासाठीही ही मुलगी तयार होती.धक्कादायक म्हणजे ही तरुणी ‘इसिस’ची ‘सुसाइड बॉम्बर’ होण्यासाठी तयार झाली होती.सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात आलेल्या या युवतीचे मतपरिवर्तन करण्याचे काम आता दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू आहे. 

इस्लामिक दहशतवादी संघटना म्हणजेच आयसिस आता भारतातही पाय पसरु पाहत असल्याची भीती गेल्या महिनाभरातल्या काही घटनांमधून व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील काही तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची भीती गुप्तचर यंत्रणांना आहे.


दहशतवादी कारवायांनी जगाची डोकेदुखी बनत असलेल्या ’इसिस’  या संघटनेच्या जाळ्यात भारतातील तरुण ओढले जात आहेत.कर्नाटक, जम्मू-कश्मीर, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधील काही तरुण-तरुणींचा या ग्रुपमध्ये सहभाग आहे.तरुणांनी ‘इसिस’च्या भूलथापांना बळी पडू नये. तरुणांनी इंटरनेट, व्हॉट्स अ‍ॅप किंवा इतर कोणत्याही मार्गाने येणारी प्रलोभने, भूलथापांपासून जागरूक राहून कोणत्याही प्रकारे समाजातील शांतता भंग होईल असे कृत्य करू नये, इसिसकडून तरुणांना भडकावण्याचे प्रकार होत असल्यामुळे आपली मुले कोणाच्या संपर्कात आहेत,यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.

वेडी आहे का हि मुलगी?आपली संस्कृती किती सुंदर आहे.आपले शिक्षण काय कमी पडले काय म्हणून हि दुर्बुद्धी झाली तिला. वेगळे काय करायचे असेल तर कमांडो मध्ये जा. पायलट बन पण दहशतवादी बनू नकोस. आईवडिलांचे असे पांग फेडू नकोस त्यांच्या जीवाला किती यातना झाल्या असतील.

युवकांनी आपण भारतीय आहोत हे जर लक्षात ठेवले आणि आपल्या धर्माचा खरा अर्थ जर समजून घेतला तर हे धर्मवेड्या संघटना कधीच टिकू शकणार नाहीत.

आपण देशप्रेमाचे धडे देण्यात कुठेतरी कमी पडतोय. ह्या वयात चुकीच्या मार्गाकडे वळणे अगदी साहजिक आहे जर आपले संस्कार आणि शिकवण पक्के नसतील. शालेय शिक्षणात या सर्व बाबींचा विचार करून योग्य ते बदल करण्यात यावे. एकदा का आपल्या देशाविषयी नितांत प्रेम आणि श्रद्धा निर्माण झाली तर मग जगात कुणीही आपले मत परिवर्तन करू शकणार नाही. याव्यतिरिक्त व्यक्तिगत पातळी वर आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन कटाक्षाने योग्य ते संस्कार होतील याची खबरदारी घ्यायला हवी.

’इसिस’ ही दहशतवादी संघटना भारतातील युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यामार्फत भारतामध्ये हल्ले घडवून आणले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे म्हणत देशातील सर्व राज्यांना सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिल्याची माहिती आहे.

 ‘इसिस’च्या जाळय़ातही आता भारतीय तरुण सापडू लागले आहेत, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.कोणताही सारासार विचार करू न शकणारी तरुणाई अशा आत्मघातकी, देशविघातक आणि धार्मिक वेड्यांच्या जाळय़ात सापडते. धार्मिक वेडाचार मग तो कोणत्याही धर्माचा असो त्याला बळी न पडण्याचे शिक्षण आता घरातूनही द्यायला हवे. 

No comments: