Tuesday, January 12, 2016

समाजाने बदलणे गरजेचे आहे.

      
सध्या अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवर अनेकवेळा विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार आणि बलात्कार घडण्याच्या घटना घडताना आपणा ऐकतो. त्यात सामूहिक बलात्कार हा एक हिंसक लैंगिकतेचा प्रकार आहे.लैगिक अत्याचारात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे.अमानुष्य गुन्हे करणारे कायद्यातील त्रुटीमुळे सहीसलामत सुटतात.पण यात पिडीत व्यक्तीला आयुष्यषभर यातना भोगाव्या लागतात.मुळात स्त्रीवरील अत्याचाराचा दोष स्त्रीलाचा देणे हेच सामाजिक विकृतीचे लक्षण आहे. 


स्त्रियांचे पावित्र्य,शिल,चारित्र्य,स्त्रिधर्म याबाबत हा अलिखित कायदा थोडा जास्तच आग्रही आहे.स्त्रिचा सारा सन्मान तिच्य योनीशुचितेमध्ये गुंतला आहे.असे वेगवेगळ्या अंगाने बजावणा-या समजुती आणि प्रथांमुळे तिच्यावर तिच्या मनाविरुध्द झालेला लैगिक हल्ला सुध्दा  तिलाच गुन्हेगाराच्या भूमिकेत नेऊन उभा करतो.अचेतन संपत्ती,मालमत्ता,जायदाद यांची लुट करणा-याला व घाला घालणा-याला समाज गुन्हेगार ठरवतो.पण शरीरावर घाला पडलेली आणि इज्जत लूटली गेलेली स्त्रिच कंलकिनी म्हणून मान खाली घालून जणू तिनेच अपराध केला आहे अशा पध्दतीने तोंड लपवत जगावे लागते किंवा आयुष्यच संपवावे लागते असा दुटप्पी समाजव्यवहार रुढ झाला आहे.लिखित कायदा  लुटारुला शिक्षा देतो,अलिखित कायदा ज्याचे लुटले गेले आहे त्या व्यक्तीलाच बदनामी, अवहेलना,प्रसंगी सामाजिक बहिष्कारसारखी जीवघेणी शिक्षा देत आहे.बलात्कार करणारा नव्हे,तर जिच्यावर बलात्कार झालेला आहे ती व्यक्ती केवळ मनानेच नव्हे,तर सर्वार्थाने उदध्वस्त होईल इतकी या अलिखित कातद्याची जरब असते.हि जरब इतकी तीव्र आहे,
की खुद्द बलात्कारीत व्यक्तीलाही आपणच गुन्हेगार असल्याचे वाटत राहते.अलिखित कायदा
समाजाने मोडीत काढला पाहिजे. 

बलत्कारीत स्त्रीला आणि तिच्या कुंटुबाला समाजाच्या त्या निदेंला व नजरांना सतत तोंड द्द्यावे लागते.पिडित व्यक्तीचे नाव लपवून ठेवावे लागते.संबंधित व्यक्तींना उपहासात्मक टिकेला सामोरे जावे लागते.पांरपारिक समजुती ,प्रथा आणि दृष्टीकोन समाजाने काळाबरोबर मागे सारल्या पाहिजेत. वर्षा नु वर्षाचा पगडा असलेला दृष्टीकोन बदललाच पाहिजे.पिडितांना कडे बधण्याचा दृष्टीकोन समाजाला बदलावाच लागेल.           

   हा दृष्टीकोन बदलण्याची सुरुवात निर्भयाच्या आईने निर्भयाचे खरे नाव जाहीर करुन केली आहे.माझ्या मुलीने कोणताही गुन्हा केलेला नाही मग तिची ओळख समाजापासून का लपवावी असे आशादेवी (निर्भयाची आई) यांचे विचार आहेत.लेकीबाळींना दूषणे न देता,आपल्या इभ्रतीला धक्का लागला असे न समजता तिच्यावर हात टकणारा गुन्हेगार आहे आणी बोटे दाखवायचीच, तर त्याच्याकडे दाखवा असे स्पष्टपणे नवे विचार मांडले आहेत.याचे स्वागत व्हायला पाहिजे. 

  अल्पवयीन मुली कि त्यांना याबद्द्ल काहीच माहीती नसते त्यांचे पुढे काय होत असेल. बलात्कारामुळे अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवर शारिरिक आणि मानसिक आघात होतात आणि त्या त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात.या पीडित मुलींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समाज काय करतो? केवळ कायदा करून स्त्रीला तिचा आत्मसन्मान परत मिळेल? दूरगामी दृष्टीकोनातून सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशनावर भर द्यावाच लागेल.समाजातील रूढी-परंपरा, चाली-रिती ज्यांचा म्हणून स्त्रीच्या प्रतिष्ठेला धोका आहे, त्या सर्व गोष्टी या समाजाच्या सकारात्मक प्रभावातून मोडून काढल्या पाहिजेत. 


पोटातला गर्भापासून ते मृत्युच्या शय्येवरील स्त्रीत्वाची चाललेली अखंड अवहेलना थांबणार आहे का? 

No comments: