Wednesday, February 3, 2016

तरुणाई व्यसानांच्या विळख्यात.



   भारताला लाभलेली सत्वात मौलवान संपत्ती म्हणजे, देशातील तरुणाई.सध्या फक्त झोपडपट्टी किंवा मध्यमवर्गातून आलेली तरूण मंडळीच नव्हे तर, अगदी विदेशी गाड्यांमधून फिरणारे,पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणारा वर्गदेखील व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला दिसतो.  व्यसन हे तरूणाईचे स्टाईल स्टेटमेट बनलंय हेच खरे आहे. 

कॉलेज कट्टा असो किंवा सोसायटीचा बाक,नवीन वर्षाची पार्टी असो, पहिले प्रश्न असतात..तू कोणती दारु पिणार?तू कोणती सिगारेट ओढतोस?तू दारु  नाही पित? कोणता  मुलगा जर मद्द्पान नाही करत तर त्याला हिन प्रवृतीचे समजले जाते.धुम्रपान आणि मद्द्पान एक ट्रेंड झाले आहे.   

    थर्टी फर्स्टमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालत नव वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा पडली आहे.थर्टी फस्ट म्हटले की दारु पिऊन  दंगा, हुल्लडबाजी असेच काहीसे समीकरण होवून बसले आहे.सरकारी आकडे सांगतात ३ महिन्यात जेव्हढी दारू विकली जात नाही त्याहून ही अधिक दारू एकटा ३१ डिसेंबर पिऊन जातो   


     आनंद साजरा करण्याची पध्दत बदलत चालली आहे.शाँपेन फोडुन ती मित्रमडंळीसह रीचवून आनंद साजरा करण्याच्या पाश्चात संस्कृतीचे अनुकरण करु लागलो आहोत.आनंद किंवा सेलिब्रेशनचा दारूशी अन्योन्य संबंध जोडला आहे. दारुशिवाय आनंद साजरा केला जात नाही आणि जी मडंळी दारुकामात भाग घेत नाहीत त्यानी आनंदोत्सव साजरा केलाच नाही असे समजले जाते.आजकालच्या तरुण पिढीला व्यसन करणे ही खूप नॉर्मल गोष्ट वाटते.

आपल्या आजूबाजूच्या हाय ल्कास लोकांमध्ये राहायचे असेल तर त्यांच्या स्टेटसप्रमाणे  वागायला पाहिजे असे त्याना वाटते.ताण पडला सिगारेट तर दु:ख झाले की दारुच्या स्वाधीन व्हायचे ही एक स्टाईल बनली आहे. 

     मुंबईत कोणत्याही आनंदत्सवात मद्यसंस्कृतीचा अंमल वाढला होता. विक्रमी  दारूविक्रीचे जे तडाखेबंद आकडे प्रकाशित झाले आहेत.होळीच्या दोन दिवसांत मुंबईकरांनी साडेतीन लाख लिटर दारू रिचवली. नववर्षाचे स्वागत करताना संपते. हीच स्थिती राज्यातल्या बहुतेक शहरांत आणि देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश इथून येणा-या बातम्या हेच सांगत आहेत. 

    तरुणपिढी आणि नशा हे समीकरण झाले आहे.सुखाच्या व दु:खाच्या प्रसंगाला नशा करुन साजरा केला जातो.नवे जन्म किंवा अकस्मात मरण,वाढदिवस किंवा लग्न,मिरवणुक किंवा निवडणुक,पास किंवा नापास,पिकनिक किंवा संमेलन,वर्षाचा पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस असो नशा केलीच पाहिजे.दारु पिणे ही एक फँशन झाली आहे.आपली संस्कृती सोडुन पाश्चात संस्कृती स्विकारलीच पाहिजे का? आपल्या सार्‍याच परंपरा कशा अमृतामय आहेत. त्या सोडून हे पाश्‍चात्त्य विष का बरं प्यायचे?

   अनंत व्यसनात बुडालेली आजची तरुणपिढी म्हणजे एक गंभीर समस्याच होऊन बसली आहे. माणसाला विकृतीकडे ढकलणारी पाश्‍चात्त्य संस्कृती आपण सर्वांनी अंगीकारली, त्याचेच भीषण परिणाम आज आपल्याला पदोपदी दिसतात.पाश्‍चात्त्य संगीत, पाश्‍चात्त्य नृत्ये आणि दारूचा महापूर आलेला दिसतो. काही ठिकाणी अमली पदार्थांचेही सेवन हमखास होते. आजच्या तरुणपिढीला अशा नृत्यरजनींचे खूपच ‘फॅड’ लागले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रात्रभर दारू पिऊन तर्र झालेले हे युवक कित्येक अपघातांना बळी पडतात.तरुणपिढी राजरोसपणे अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून येते.नैराश्य, मनावरील दडपण, अतिताण, दु:ख यामुळे ते व्यसनांना बळी पडत आहेत. 

    तरुणांमध्ये ड्रग्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. चांगल्या घरातील, सुशिक्षित आणि समंजस मुलेही ड्रग्जच्या विळख्यात  अडकलेली दिसत आहेत. यामागे एकच कारण आहे. काळ्या पैशाची किक्. काळा पैसा घरात आला की, पैसेवाल्या बडे बाप के बेट्यांना या व्यसनाच्या सवयी लागतात. खरा ड्रग्जचा विळखा हा पब, डिस्कोथेक येथेच पाहावयास मिळतो. सर्वच वर्गात ही समस्या वाढत आहे. कुणी टेंशनच्या नावाखाली, कुणी पैशाच्या मस्तीच्या जोरावर या विळख्यात सापडत आहे. पण या नशेला खरी किक् काळ्या पैशाचीच आहे. व्यसनांच्या कारणांची भली मोठी लिस्ट असली तरी कौटुंबिक संस्काराच्या अपूर्ततेमुळे अशा घडामोडी होत आहेत.

व्यसन आरोग्याला व जीवनाला हानिकारक आहे हे तरुणाईने जाणून घेतले पाहिजे व व्यसनापासून दूर राहीले पाहिजे.

     भारताला महासत्ता व्हायचे असेल तर तरुणपिढीला व्यसनमुक्त करणे आवश्यक आहे.आपल्या देशाचे भवितव्य तरूणांच्या हाती आहे.तसेच तरुण पिढीने सामाजिक भान ठेवून  आपली संस्कृतीही जपली पाहिजे. 

No comments: