नवी मुबंईत दुसरे विमानतळ न होण्यामागे पर्यावरण हे कारण नसून राजकारण हे मुख्य कारण असल्याने निर्दशनात आले आहे. विमानतळाला विरोध करणे व तो आपल्या पदरात पाडण्यासाठी नेत्यांमघ्ये स्पर्घा असून या स्पर्घेत बिल्डर लाँबी सहाय्य करीत आहे.विमानतळ होणार याचा फायदा घेण्यासाठी जागेत पैसा गुंतवणा-या बिल्डर लाँबीला दुखविणे राजकिय पक्षाना परवडणारे नाही म्हणुन हा वाद पतंप्रघानांपर्यत नेला आहे.नवीन विमानतळाच्या बाजुच्या जागा राजकिय नेत्यांनी खरेदी केल्याने नवी मुबंईतच विमानतळ व्हावा असा त्यांनी आग्रह घरला आहे.नेत्यांना विकासाऐवजी स्वार्थ अधिक महत्वाचा वाटतो. विमानतळाच्या वादामागे शहराचा विकास नसून अर्थकारणासह सत्ताकारण दडलेले दिसते.
विमानतळासाठी सर्वाना योग्य जागा निवडताना ती पर्यावरणाची हानी न करणारी,सोप्यारीतीने जागा संपादीत करता येणारी,शहरातून विमानतळापर्यतचा मोठा रस्ता,विकासासाठी लागणारा निधि अशा गोष्टीचा विचार व्हावा. पर्यावरणाचा समतोल राखत दुसरा विमानतळ बाधंला नाहीतर या वादात आणखी कीती वर्ष वाया जातील.सर्व पक्षानी आपले हितसबंध बाजुला सारुन सर्वाना अनुकुल ठरेल अशी योग्य जागा निश्चीत करुन केंद्रांकडुन समंती मिळवावी. प्रगती ही माणसाची गरज पण निर्सगाच्या मदतीने करायला पाहीजे.
ही माझी प्रतिक्रिया आजच्या 'महाराष्ट्र टाईम्स'या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.
No comments:
Post a Comment