Thursday, November 5, 2015

वाचन संस्कृतीची गरज

         आजच्या युगात वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल.वाचाल तर वाचाल' ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे.वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचारसंपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे.वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. 

        अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या    घडीला जगातील कानाकोपर्‍यात घडणार्‍या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत 
साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त   वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवीत असत. तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. ती मोबाईलच्या आहारी आणि इंटरनेटवर वेळ      घालवित असल्याचे आजचे चित्र आहे. त्यांना वाचनासाठी वेळ उपलब्ध नसतो. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपते आहे. तरूणांमध्ये  वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपRमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

लोकमान्यांनी ‘तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर वाचन करा’ असा संदेश दिला. धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन करा, असा उपदेशही त्यांनी केला. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात इलेक्ट्रॉनिकच्या दुनियेत त्यांच्या उपदेशाकडे नव्या पिढीचे लक्ष विखुरले गेले आहे.सखोल विचारातूनच एकरूप समाज निर्मित होत असतो आणि सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातूनच तयार होते.वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात वाढ करण्यासाठी वाचन हा 
एकमेव मार्ग आहे.

  वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची  मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे  जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात वाढ करण्यासाठी  वाचन हा एकमेव मार्ग आहे. 
   

        लहानांपासून मोठय़ांपर्यंत ‘पुस्तके’ हा अनेकांच्या जिव्हाळय़ाचा विषय. पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय. आज त्या वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ‘ई-बुक’ने घेतली आहे. ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु असे असले तरी वाचन संस्कृती हळू-हळू कमी होत आहे. तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपRमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. पुस्तकांमधील समम्ृद्ध विचारांचा आपल्या 
जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कायमचा बदलून जातो.


पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा-आकांक्षाचे क्षितीज निर्माण करणारे साधन आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात. त्यामुळे मानवाच्या कमकुवत मनाला धीर येतो. वाचनाची सवय एकदा लागली की माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंगून जातो. त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून परावृत्त होतो.वाचन संस्कृती जपण्याशिवाय पर्याय नाही. वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो. नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होतो.तरुण पिढीने पुस्तकवाचन हा छंद जोपासला पाहिजे. 

साक्षर तरुणांपैकी  ६१ टक्के जण, त्यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत समाधानी आहेत. मात्र, वाचनाचा छंद असलेल्या तरुणांमध्ये समाधानाचे प्रमाण ७० टक्के, तर कमी वाचन करणाऱ्यांमध्ये हेच प्रमाण ५८  टक्के आहे. 

वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, त्यांस आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही.  वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.

     माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन साजरा करीत वाचन संस्कृतीची जनजागृती केली पाहिजे. 

No comments: