विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी लग्नाची पत्रिका छापून दिले जाते.लग्नसमारंभाची माहीती या पत्रिकेला असल्याने तिला महत्व असते.लग्नसराई सुरु झाल्यापासून या पत्रिका घरी येऊ लागल्या आहेत.
पण हल्ली नागपूरात राज्याचे अधिवेशन सुरु आहे.मोर्चे व पत्रिकांचे युध्द सुरु आहे.सिंचन घोटाळा हा चर्चेचा मुख्य विषय असल्याने काँग्रेसने 'श्वेतपत्रिका' काढून आपली बाजु मांडली.श्वेत पत्रिकेचा पंचनामा करीत व सिंचन घोटाळ्यावरून चहुबाजूंनी सरकारला घेरताना भाजपने श्वेत पत्रिकेच्या विरोधात 'काळी पत्रिका' जाहीर केली . सिंचन घोटाळयावर विरोधकांनी काढलेल्या काळ्या पत्रिकेला उत्तर देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने 'सत्य पत्रिका'काढली आहे.शेवटी सिंचन घोटाळ्यावरून भाजपच्या काळ्या पत्रिकेनंतर सरकारच्या श्वेत पत्रिकेची विदर्भावर काय दुष्परिणाम होतील,अशी वस्तुस्थिती मांडणारी 'पिवळी पत्रिका' विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य माजी मंत्री अॅड.मधुकरराव किंमतकर यांनी जारी केली आहे. आजूनही काही रंगाच्या पत्रिका प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.
काय म्हणतात या रंगीत पत्रिका? पत्रिका काढण्याची फँशन येऊन त्याची स्पर्धा लागली आहे.कोणत्या रंगाची पत्रिका सत्य गोष्टी दाखवते?पत्रिकेचे रंग मात्र पक्के व जुळ्वून आणलेले आहेत.सगळ्या पत्रिका आपली बाजू सत्य दाखवायचे आणि दुस-याचे मते खोडण्य़ाचा प्रयत्न दिसत आहे.सर्व पक्षानी आपापल्यापरीने सिंचन घोटाळ्याचे स्वरुप समोर आणले आहे.या विषयावर चर्चा न करता आपली मते त्यानी या पत्रिकेतून मांडली जात आहेत.पत्रिका छापून ही राजकिय मडंळी हा घोटाळा दाबून टाकतील असा अंदाज आहे.सामान्य जनतेला या पत्रिकेने काय मिळणार आहे?
जनतेला या रंगीत पत्रिकेचे काही सोयरेसुतक नाही.या पत्रिकेचे महत्व फक्त राजकारण्यांसाठी.या पत्रिका जनतेपर्यत पोहचतच नाहीत.पत्रिकेत नोंदी खोट्या व चुकीच्या असतील याची कल्पना सर्वाना असल्याने त्या वाचतोय कोण? प्रलंबित प्रकल्प कितीतरी आहेत.ते कधी पुर्ण करणार आहेत? राज्यातील भीषण पाणीटंचाईला कसे तोंड देणार याची प्रथम चर्चा होण्याची गरज आहे.यंदा पाण्य़ाच्या समश्येवर राज्यभर उग्र रुप धारण केले आहे.बंधा-यांसारख्या लोकोपयोगी कामांकडे लक्ष द्यायाला प्रशासनाला वेळ नाही.बंधारे बांधताना घोटाळे आता टँकरवर कोट्यावधी रुपये खर्च करीत राज्याला कर्जात लोटण्याचे काम सुरु आहे.या गोष्टीना रंगीत पत्रिकेत जागा नसेल.
घोटाळे करीत राजकारण्यानी राज्याची परीस्थिती हालाकीची केली आहे.ती कशी सुधारायची यावर चर्चा न करता पत्रिका काढ्णे सुरु आहे.
या पत्रिकेचे पुढे काय होते? याबद्द्ल 'महाराष्ट्र टाईम्स' मघ्ये प्रसिध्द झालेला लेख
नामदेवची भेळेची गाडी होती . ओली भेळ , सुकी भेळ . त्याच्या हाताला चव होती . गर्दीच्या वेळी तर त्याचा हातएखाद्या कलावंताने एकाच वेळी चार - सहा वाद्ये वाजवावीत तसा चालत असे . जणू तो स्वतःच रविशंकर आणितो स्वतःच झाकीर हुसेनही . कागदाचा चौकोर तुकडा डाव्या तळहातावर तोलत उजव्या हाताने त्या कागदावर तोभराभरा चुरमुरे , शेव , डाळ , कांदा , कोथिंबिर , चिंच - गुळाची चटणी , पुदिना - मिरचीचे वाटण घेत असे ,त्यात चमचा खूपसून ते कालवले की भेळ तयार . खाणारा फिदा . एक दिवस नामदेव असाच गर्दीच्या वेळीहातावर भेळीचा कागद तोलत असतानाच त्याच्या गाडीच्या पुढ्यात एक शानदार कार थांबली . पाठोपाठ आणखीचार - सहा गाड्या . पहिल्या गाडीतून अजितदादा उतरले . पाठोपाठ इतर गाड्यांमधले श्रीमंत भालदार -चोपदारही उतरले . तडकाफडकी राजीनामा फेकून बाहेर पडलेल्या दादांना रस्त्यातच भूक लागली . नेमकी तेव्हाचसमोर नामदेवची गाडी दिसली म्हणून दादांनी गाडी थांबवली होती . दादांना पाहून इतर सामान्य ग्राहकांनी मगकाढता पाय घेतला आणि नामदेव दादांच्या ऑर्डरमध्ये गुंतला . ' तिखट बनव मस्तपैकी , आपल्याला काहीचअळणी चालत नाही ', म्हणत दादांनी नामदेवने फडकं मारून स्वच्छ केलेल्या बाकड्यावर बैठक जमवली .नामदेवचा सराईत हात चालू लागला . तयार झालेल्या भेळेच्या कागदाच्या खाली नामदेवनं खास पाहुण्यांसाठीराखून ठेवलेली प्लास्टिकची प्लेट धरली . ती परत देत दादा म्हणाले , ' भेळ खाण्याची मजा कागदावरच , ही प्लेटठेवून दे आत .' दर्दी खाणारा भेटला म्हणून नामदेवही खूश झाला . सगळ्यांनीच भुकेल्यापोटी भेळ हाणली . हातपुसायला दादांनी नामदेवच्या गाडीवरला एक कागद घेतला . जाता जाता दादांनी विचारलं , ' नाव काय रे तुझं ?'खूश होत नामदेव म्हणाला , ' जी , नामदेव .' दादांनी एक पॉझ घेतला आणि म्हणाले , ' तुला एक खास बक्षीसदेणार आहे मी . तू एक काम कर , आठवड्यातून एकदा बंगल्यावर चक्कर टाकत जा , तुझं बक्षीस तयार झालं कीदेतो तुला .'
आठवडा गेला . नामदेवनं विचार केला , आपण क्षुल्लक भेळवाले . दादा अनेकांचे पोशिंदे . ते सवयीने बोलून गेलेअसतील बक्षीस देतो म्हणून . ते राजे असते आणि त्यांच्या गळ्यात कंठा वगैरे असता तर गोष्ट वेगळी . पणनामदेवच्या बायकोनं हट्ट धरला . दादा एवढे सांगून गेले , तर जा की बंगल्यावर . काय बिघडतंय तुमचं ?
नामदेव दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून दादांच्या बंगल्यावर गेला . आत जायची त्याची काही हिंमत होईना . कोणीविचारलं , काय काम आहे तर काय सांगणार ? म्हणून तो तसाच फाटकाबाहेर उभा होता . तेवढ्यात दादांची गाडीबाहेर पडली . दादांचं नामदेवकडे लक्ष गेलं . त्यांनी गाडी थांबवली . खिडकीची काच खाली केली आणि म्हणाले , 'पुढच्या आठवड्यात ये .'
नामदेव निराश झाला . दादांसारखा माणूस आपल्याला बोलावतो , ओळखतो याचं त्याला अप्रूप वाटलं ; परंतुत्यांना काय बक्षीस द्यायचं असेल ते त्यांनी देऊन टाकावं आणि मोकळं करावं , असं त्याला वाटत होतं . आता परतबंगल्यावर येण्याच्या भानगडीत पडू नये , असं त्याला वाटलं . परंतु त्याची बायको त्याला प्रत्येकवेळी उमेद देतराहिली आणि तो दर आठवड्याला जात राहिला . त्यानं जायचं , बंगल्याच्या फाटकाबाहेर उभं राहायचं , दादांनीबाहेर पडता पडता गाडी थांबवायची , काच खाली करायची , त्याला ' पुढच्या आठवड्यात ये ,' म्हणून सांगायचं हेदर आठवड्याला घडू लागलं .
नामदेव त्याचा भेळेचा धंदा नेहमीच्याच उत्साहाने करत होता . दरम्यान , अजितदादांनी फेकलेला राजीनामामुख्यमंत्र्यांनी हवेतल्या हवेतच झेलला . आणि असेच ७२ दिवस गेले ... दादांनी आपला राजीनामा विस्मरणाच्यातिजोरीत टाकून देऊन पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . त्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या . रात्री नामदेवबायकोला म्हणाला , ' आता दादा पुन्हा बिझी होणार . आता कसले बक्षीस अन् कसले काय . मी उगाच आपलाजात राहिलो बंगल्यावर .' बायको म्हणाली , ' आता एवढे दिवस माझं ऐकलं ; आता आणखी एकदा ऐका . यावेळीही त्यांनी नुसतीच काच खाली करून परत पाठवलं तर मग पुन्हा कधी बंगल्यावर नका जाऊ .'
आता हे शेवटचंच , असं म्हणत नामदेव दादांच्या बंगल्यावर गेला . यावेळी मात्र दादा त्याची वाटच पाहत होते .नामदेवला बंगल्यात बोलावलं गेलं . त्याचा नीट आदर - सत्कार केला गेला . अजितदादांच्या बायकोनं नामदेवच्याबायकोसाठी साडी - चोळी दिली . अखेर दादांनी आपल्या बंगल्याच्या आवारात एक टेम्पो उभा होता , त्याकडे बोटदाखवलं व म्हणाले , ' तुला भेळेसाठी कागद लागतात ना , मी हा टेम्पो भरून कागद देतो आहे तुला .'
आणि नामदेवचं घर सिंचनाच्या श्वेतपत्रिकेच्या गठ्ठ्यांनी भरून गेलं . आता त्याला किती तरी दिवस भेळेच्याकागदासाठी रद्दीच्या दुकानात जायची गरज नव्हती . कागदाचे ते गठ्ठे बघून नामदेव निराश झाला ; परंतु त्याचीबायको हुशार होती . ती म्हणाली , ' असे निराश होऊ नका , सिंचनाचा फायदा सर्वांना . उद्यापासून भेळेचा दरदुप्पट करा . श्वेतपत्रिकेच्या कागदांवर भेळ खाण्याची संधी . त्वरा करा चुकवू नका . कागदांचा साठा मर्यादित .अशी जाहिरात करा .'
नामदेवनेही मग सिंचनाचा फायदा घेतला आणि त्याच्या गाडीवर झुंबड उडाली . एक दिवस त्याच रस्त्यानेपृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा जात होता . त्यांनाही भूक लागली म्हणून ते थांबले . त्यांनी आणि त्यांच्या सोबतअसलेल्यांनी भेळ घेतली . भेळ खाता खाता चव्हाण अचानक थांबले . त्यांनी आपल्या हातातील कागदावरीलछापील मजकूर वाचला . मग आपल्या सोबतच्या सर्व लोकांजवळ जाऊन त्यांनी त्यांच्या कागदांचे निरीक्षण केलेआणि म्हणाले , ' भेळ खाऊन झाल्यावर कागद फेकू नका , माझ्याकडे द्या . ही श्वेतपत्रिका माझी वाचायची राहूनचगेली होती . त्यात काय आहे बघू तरी ...'
1 comment:
तुमच्या लेखाचा रोख लक्षात आला व तुमच्या भावनेशी सहमत आहे
माल अजूनही ह्या घोटाळ्यांच्या पत्रिका व त्यांचे पुढे काय होते हे अजिबात कळत नाही.
Post a Comment