Friday, October 2, 2020

मास्क

 मास्क



रोगाच्या साथींनी जगाला शिकवलेला सर्वांत महत्त्वाचा धडा म्हणजे मास्कचा वापर. व्हायरसपासून स्वत:चा बचाव होण्यासाठी आणि आपल्यापासून दुसऱ्या कोणाला संसर्ग होणार नाही यासाठी वापरला जातो .सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये, वाहनांत मास्क वापरणे बंधनकारक झाल्रे आहे.घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर केला नाही तर गुन्हा दाखल होतो व दंड भरावा लागतो. बाहेर जाताना जवळ वापरण्यांच्या वस्तूंमध्ये मास्कची नव्याने भर पडली आहे. तसेच मास्कला जपावे लागते आहे. मास्कमुळे घराबाहेर तुमचे तोंड बंद झाले व तुमची ओळख राहीलेली नाही. रस्त्यावरुन जाताना प्रत्येकांच्या चेह-यावरचे मास्क पाहून थोडे विचित्र वाटते. प्रत्येक जण दुस-याकडे  संशयित नजरेने पाहत असतो.दुस-यांना टाळतो व दूस-यांपासून दूर राहतो. 


मास्क वाप-यातून कोणाची सुटका झाली नाही. पंतप्रधान ते सामान्य नागरिकापर्यत सर्वाना वापरण्याची गरज आहे.श्रीमंत व गरीब, स्त्री व पुरुष, तरुण व वयस्कर, नेते वे कार्यकर्ते, नट व नट्या, डॉक्टर व परिचारीका, पोलीस व सफाई कामगार यातील कोणालाही मास्क न वापरण्याची मुभा नाही.बोलायला लागलेल्या लहान मुलांची मास्क लावून बोलती बंद केली आहे.चष्मेधा-यांना तर या मास्कचा बराच त्रास सहन करावा लागत आहे. मास्कमुळे संवाद साधताना अनेक अडचणी येतात.चेहऱ्यावर मास्क असल्याने समोरच्या व्यक्तीला नेमके  काय सांगायचे आहे हे लक्षात येणं अवघड जातं. अशावेळी समोरच्याकडून पुन्हा एकदा झालेल्या संवादाबद्दल खात्री करून घेतली पाहिजे. मास्क असल्याने लिपस्टिक कितीही आवडत असली तरी त्याचा उपयोग नाही हे मुलींना कळून चुकलंय.


काही जण फक्त पोलिसांची भीती किंवा बाहेर पडताना मास्कची सक्ती ह्याच विचारांनी मास्क वापरत असताना दिसतात. मास्क फक्त देखावा म्हणून घालतात, किंबहुना बाहेर अनेक जणांच्या गळयाभोवती हे मास्क लटकलेले दिसतात. क्वचितच कोणाचं लक्ष गेलं, किंवा उगाच रोखून पाहिल तर हा ‘मास्क’ लोक वर उचलतात, आणि पुन्हा मग पहिले पाढे पंचावन्न. लोकांना मास्कचे खरे महत्व किती समजले आहे का ह्यावर आजही प्रश्न चिन्ह आहे. लोकांनी स्वतःच्या आरोग्यासोबत इतरांचा देखील विचार करणं महत्वाचं आहे. जेव्हा मास्क न घालता बाहेर पडता, तेव्हा स्वत: बरोबर इतरांनाही अडचणीत आणता.


बाजारात आणि ऑनलाईन मास्कमध्येही विविधता दिसून येत आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळत आहेत. स्त्रियांसाठी आता प्रत्येक ड्रेसला मॅचिंग असलेले रंगीत मास्कही मिळू लागले आहेत.बाजारात ह्या नव्या वस्तुची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. संपूर्ण जगभरामध्ये कोरोनानं घातलेला धुमाकूळ पाहिल्यानंतर मास्क किती महत्वाचा आहे, याची जाणीव झाल्यानंतर या मास्कची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी मास्कची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवली आहे.  


लोकांची गरज लक्षात घेऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचतगटाना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.राज्यातील बचतगट पुढे आले आणि त्यांनी तयार करण्याचे काम सुरु केले.या कामातून घरात बसून राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला.हे आपत्तीच्या काळातील सर्वात मोठे यश आहे. वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत. एवढेच नाही तर शिस्तीत मास्क बांधणाऱ्या ब्रिटिशांना आता हा मास्क संरक्षक ठरत आहे.रोजगार गमावलेल्या काळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला आहे.


मास्कला मराठीत ’मुखनाक संरक्षक जीवजंतूरोधक हवागाळ झाकोळ पट्टी’ असे मजेत म्हणतात.    


मास्क वापरुन माणसं कंटाळली आहेत. चेह-यावरून हा मास्क कधी उतरवला जाणार याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. मास्क पासून कधी रे सुटका होणार? ज्या दिवशी ही सुटका होईल तो दिवस सगळ्यांसाठी खुपच आंनदाचा असेल.



Thursday, August 27, 2020

सगळे काही ऑनलाईन

                                          सगळे काही ऑनलाईन 


हल्ली लहान मुलांपासून देशाची कामे सर्व काही ऑनलाईन सुरु आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत आपण ब-याच गोष्टी ऑनलाईन करण्यास सुरुवात केली आहे.हे ऑनलाईन प्रकार आपण कधी आत्मसात केले ते कोणाला कळले नाही. जो तो सगळं काही ऑनलाईन करण्यासाठी धडपडत आहे. ऑनलाईन व्यवहार सर्वांना सोयीचे वाटू लागले, हा ऑनलाईन फायदा झाला. पण ऑनलाईनमध्ये फसवणूक सुरु झाल्याने लोकांचे पैसे लुबाडले गेल्याने ’ऑनलाईन’ गैरसोयीचे ठरले.ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात  वाढ होतेय.वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवून ऑनलाईन फसवणूक होत आहे. नोकरदारवर्ग वेतन त्यांच्या खात्यात जमा झाल्याने तो वर्ग खुष झाले.  

सुरुवातीला बॅकेचे सगळे व्यवहार ऑनलाईन सुरु झाले. लोकांच्या व बॅकेसाठी खूपच सोयीचे झाले. पहिल्यांदा व्यवहार ऑनलाईन करायला ग्राहक घाबरत होते.नंतर सोपे व सोयीचे वाटू लागले.घरातू सगळी बीलं वेळेत भरली जाऊ लागली. शेअर मार्केटचे सर्व व्यवहार ऑनलाईन होतात. प्राप्तीकर भरण्यासाठी व्यवहारांची माहिती ऑनलाईन पडताळून पाहणे करदात्यांना सुलभ झाले.विमा पॉलिसी खरेदी किंवा नूतनीकरण करता येत आहेत. 

देशाच्या कितीतरी गोष्टी ऑनलाईन सुरु झाल्या आहेत. सगळ्या मंत्र्याच्या सर्व मिटिंग ऑनलाईन झाल्याने नेत्यांचा वेळ व त्रास कमी झाला. देशाचा पैसा वाचला. कितीतरी उदघाटन लोकांनी ऑनलाईन घरात बसून पाहिले. सरकार शेतक-यांच्या खात्यात  पैसा जमा करु शकले. निवडणुकातील उमेदवार उमेदवारीचा अर्ज ऑनलाईन भरु लागला. 'आपले सरकार' या वेब पोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रारी आणि अभिप्रायासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. 

अमेझॉन व फ्लिपकार्ड ह्यांच्याकडून काही गोष्टी ऑनलाईन खरेदी करु शकत होतो.आता तर बिल्डिंग खालचा वाणी देखील ऑनलाईन वस्तू  पाठवू लागला. भाजीवाला, मच्छीवाला, केकवाला व हॉटेलवाला ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू घरी पाठवू लागले आहेत.लोकांना बाहेर न पडता सर्व गोष्टी दारावर येऊ लागल्या.ऑनलाईन खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेऊन खरेदी केल्यास घरबसल्या खरेदी करण्याचा आनंद आपण लुटू शकतो.

शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण संस्थेसाठी ऑनलाईन प्रवेश,ऑनलाईन क्लासेस व ऑनलाईन परिक्षा व निकाल सर्व काही ऑनलाईन सुरु झाले आहे.विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण केले आहे. पासपोर्ट व व्हिसा ऑनलाईन मिळू लागले.

आजारपणात डॉक्टर देखील फोनवर किंवा व्हिडीयो कॉलवर रोग्याची माहीती घेऊन त्याला औषध देऊन बरा करीत होते.फार्मसीमधून औषधं ऑनलाईन मागवली की घराच्या दारात औषधं येऊ लागली. 

तरुणांना ऑनलाईन नोंदणी करून नौक-या मिळू लागल्या. ऑनलाईन लग्न जमू लागली.उंबरठे झिजवायची व शोधाशोधा करण्याची गरज नाही. लोकांना वृतपत्र ऑनलाईन वाचण्य़ाची सवय लागली. वाहतुक पोलीस वाहक चालकांच्या चुकांवर ऑनलाईन दंड भरण्याची शिक्षा करू लागला.एसटी पासून विमानापर्यत सर्व तिकिटं ऑनलाईन उपलब्ध झाली. पर्यटनातल्या सर्व गोष्टीच ऑनलाईन बुकिंग करु शकलो.  जूने चित्रपट,नाटकं व जूने क्रिकेट किंवा इतर खेळांचे सामने ऑनलाईन पाहू शकतो.रम्मीचा खेळ ऑनलाईन खेळून कर्जबाजारी झाले आहेत.राज्यात ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. 

गणेशविसर्जन करण्यासाठी ऑनलाईन तारीख, वेळ बुकिंग करावी लागणार. देवाला घरी आणण्यापासून देवाचे विसर्जनासाठी ऑनलाईन करावी लागत आही.देवदेवतांचे दर्शन व आरत्या रोज ऑनलाईन पाहू शकतो.प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही.घरात बसून देशातील मोठ्या देवस्थानाचे दर्शन घेऊन देवाला देणगी देखील ऑनलाईन भरू शकता.गणपतीला गावाला जाण्यासाठी मुंबईकरांना ई-पास ऑनलाईन काढावा लागत आहे. 

सगळ्यात वाईट शेवटी माणसाचं अंत्यविधी देखील लोकांना ऑनलाईन पहावे लागले.सगळ्यात वाईट गोष्ट घडली. 

अशाप्रकारे ब-याच गोष्टी ऑनलाईन करता येऊ लागल्या आहेत.पण जेव्हा निवडणुकीचे मतदान ऑनलाईन होईल तेव्हाच सर्व ऑनलाईन झाले असे मी मानतो.

यंदाचा गणेशोत्सव

                                                यंदाचा गणेशोत्सव 


यावर्षी बाप्पाचे आगमन शांततेत झाले व काल गणेशभक्तांनी दिड दिवसाच्या बाप्पाला शांततेत व सुरक्षिततेत भावपूर्ण निरोप दिला.गणेशभक्तांना गणपतीबाप्पाला कसे आणायचे? असा प्रश्न पडला होता.यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.बाप्पा कधी आले आणि गेले ते कळलेच नाही. यंदा मात्र मनाला रुखरुख लागून गेली. दरवर्षी प्रमाणे बाप्पाचा आदरातिथ्य करता आले नाही. दरवर्षीप्रमाणे मिरवणुका,सजावट, आरत्या व जाणरणं झालेच  नाहीत.गणेशोत्सवाच्या तयारीला खूप दिवसापासून सुरुवात व्हायची.सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप उभे राहून डोकेरेशन सुरु व्हायचे.कोकणात जाणा-यां चाकरमान्यांची तिकीटं बुक व्हायची.खरेदीची धावपळ सुरु असायची.  


यंदा बाप्पाच्या मुर्तीची ऑनलाईन बुकिंग झाली. गणपतीचे आगमन ढोलताश्याच्या मिरवणुकीने झाले नाही.तर ठरलेल्या वेळी बाप्पाची मुर्ती घरपोच झाली.सजावट घरातल्या वस्तूनेच केली.कागदी फुलं,वीजेची तोरण अशी साजेशी सजावट करण्यात आली.रात्री रात्री जागवून डेकोरेशन झाले नाही.वर्गणी जमा केली नाही.   

 

गुरुजीने ऑनलाईन पुजा सांगत प्राणप्रतिष्ठा केली. काही गुरुजीने तोंडाला मास्क लावून पुजा सांगितली.पुजेचे साहित्य,फुलं,फळं मिळाले तसे अपर्ण केले.पाहुणे मंडळी आली नाहीत.सुनेसुने वाटले.फक्त घरातल्याच मंडळीने पुजेत भाग घेतला.घरातल्या महिलांनी मात्र बाप्पाला नारज केले नाही. बाप्पाला आवडतात त्या उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला.यावर्षी मावा व खव्याचे मोदक बाप्पाला मिळाले नाही. काही नातेवाईकांनी कुरियरने प्रसाद पाठवला होता.

फक्त आपल्या घरातच ठरविक आरत्या शांततेत झाल्या.दुस-यांकडे आरतीसाठी जाता आले नाही.ब-याच नातेवाईक व मित्रमंडळींनी ऑनलाईन दर्शन घेतले व आरत्या केल्या.महिलांना नटायला व सजायला मिळाले नाही.बाप्पाच्या दर्शनाला कोणीच आले नाही.

ढोलताशा व फटाल्यांच्या जल्लोषात होणारे बाप्पाचे विसर्जन यावर्षी सुरक्षितता राखत कृत्रीम तलावात तर काहींनी घरातच बालदीतच केले. गणेशोत्सवाला यंदा मजा आली नाही.पुढच्या वर्षी मोठ्या आनंदात सण साजरा करु असे सांगत बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांच्या डोळ्यात पाणी आले. ’काही चुकले असेल तर क्षमा कर’ हे सांगायल्या दोन्ही कर जुळले होते.    

नेहमी आनंदात साजरा होणारा बाप्पाचा सण गणेशभक्तांना सुरक्षा पाळत शांततेत साजरा करावा लागला.गणेशोत्सव सोहळा मनासारखा साजरा करता न आल्याने गणेशभक्त नाराज दिसले. गणेशोतसवाच्या इतिहासात यावर्षीच्या आगळ्यावेगळ्या  गणेशोत्सवाची नोंद होईल. 

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीतल्या वारक-यांनी साधेपणा दाखवला तसाच साधेपणा गणेशोत्सवात गणेशभक्तांनी दाखवला.अशा   बदलाचे स्वागत व्हायला पाहिजे.   

यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करीत जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करुन दाखवला.

Monday, August 10, 2020

पावसाचे दिवस

                                                             पावसाचे दिवस


पाऊस म्हणजे अख्या सृष्टीला वेड लावणारा अद‍्भूत सोहळा. आपण पावसाच्या आगमनाची वाट पाहत असतो. पावसाचा अंदाज वर्तवला जातो.पाऊस आला की सर्वांना आंनद होतो.पाऊस आपल्यासोबत काहीतरी नविन घेऊन येतो. सुरुवातील येताना पाऊस मोठ्याने गडगडाट करत येतो तर कधी वादळाच्या रुपात गरजतो. आकाश भरून येत आणि मेघ आनंदाने गरजतात आणि आपल्यावर पावसाच्या  जलधारा कोसळू  लागतात.पाऊस पडायला लागल्यावर सामान्य माणसंही आपपाल्या पध्दतीने त्यांचं स्वागत करतात व आस्वाद घेतात. पावसात मनमुराद भिजायला माणसं बाहेर पडतात. तरूण बाईक काढून मस्त भिजत लाँग ड्राईव्हला जातात. चहा आणि गरमागरम कांदा भजी खातात. रोमँटिक कविता सुचतात.लिंबू मारके कणीस खातात.जुन्या आठवणीत रमतात.पावसाची गंमत ही वेगळीच असते.पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार तर कधी अचानक धुंद करणार असतो.झिमझिमणारा पाऊस,टिपटिपणारा पाऊस,धो धो कोसळणारा पाऊस व टप टप पडणारा पाऊस.मना-मनात नवा उत्साह, नवा तजेला फुलवितो.


वेगवेगळ्या वयात पावसाची मजा घेण्याचे प्रकार वेगळे असतात.प्रत्येक वयात पावसाबद्दलची ओढ तशीच कायम टिकून राहते.शालेय जीवनात 'ये रे ये रे ..पावसा’ म्हणत पाण्यात कागदाच्या होड्या सोडायच्या तर कॉलेजच्या काळात विंडशिटर घालून किंवा भिजत मोटर सायकलवर प्रेयसीसह भिजायचे. लग्नानंतर एका छत्रीत पत्नीसह हिंदी चित्रपटातील गाणी गात बगीच्यात भिजायचे. उतार वयात एखादा पेग किंवा औषधाच्या गोळ्या खात आठवणीत जगायचे.  

सृष्टीवर सर्वत्र सृजनाचा चमत्कार घडत असतो.धरती तर किती विविधतेनं नटते. आटलेल्या नद्या, विहिरी, ओढे पाण्याने तुडुंब भरतात. प्रत्येकाच्याच चेहर्‍यावरचा आनंद द्विगुणित करत पाऊस बरसत असतो. निसर्ग बहरलेला दिसतो. निसर्गाचा अस्सल अनुभव घेण्यासाठी मात्र पावसाळ्यासारखा मोसम नाही. निसर्ग अगदी जर्द हिरवा शालू नेसून नटलेला दिसतो. दर्‍या-खोर्‍यातून नितळ पाण्याचे झरे वाहत असतात.विविध रानफुलं निसर्गात विविध रंगांची उधळण करतात.धुक्यात हरवलेल्या वाटा शोधव्या लागतात. तर कधी झुडपांवरचे दवबिंदू न्याहाळावे लागतात.कडेकपारीतून लहान मोठे ओहोळ आणि धबधबे कोळसतात.हिरव्या छटांची जणू चढाओढ असते.श्रावणातला पावसाचा रंग काही निराळाच असतो. कधी आकाशात क्षणात काळे-निळे ढग, क्षणात श्रावणसरींची मुलायम रिमझिम, सोनेरी उबदार उन्हं यांचा लपाछपीचा खेळ मस्त रंगतो 


शेतकरी डोळ्यात तेल घालून वरुण देवाची आतुरतेने वाट पाहताना दिसतात. शेतकर्‍यांना तर पावसाचाच आधार असतो. भरपूर पीक यावे यासाठी नाही पण निदान एक वेळचे पोट भरता यावे यासाठी तरी पावसाने पडण्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असतो.पाऊस अत्यंत लहरी आहे. तो कधी रिमझिम तर कधी उग्र रूप धारण करतो. शेतक-यांच्या मनात उद्याचे पीक फुलवणारा.त्याच्या कष्टावर

समाधानाचं शिंपण करणारा हा पाऊस. 


मुंबईत पाऊस पडून पणी साचून रेल्वे व बस सेवा बंद पडली.वाहतुक कोंडी व रस्त्यावर खड्डे पडले की पाऊस सुरु झाल्याचे लोकानुमते जाहीर होते.कार्यालये व शाळा,कॉलेज बंद झाल्यावर घरात बसून पावसाचा आंनद घेता येतो.मुंबईकरांचे पावसावर आणि पावसाचे मुंबईकरांवर किती प्रेम आहे हे शब्दात व्यक्त करणे कठीण असले तरी दोघांचा लहरीपणा मात्र सारखाच आहे.मुंबईतील पाऊस हा देशातील इतर भागातील पावसापेक्षा निश्चितच वेगळा असतो कारण मुंबईतील पाऊस सर्वांनाच हवा असतो.      


कित्येकांच्या नव्या आयुष्याची साक्ष म्हणजे हा पाऊस तर काहींच्या दुःखावर पांघरूण ओढणारा हा पाऊस. नव्या जिवाला पालवी देऊन, अंकुर आणणारा हा पाऊस, सहवासाची ओढ वाढवाणारा पाऊस, सर्वाना हवाहवासा वाटणारा हा पाऊस.


Monday, August 3, 2020

मैत्री....एक अनमोल नातं




मैत्री....एक अनमोल नातं


मैत्री कधी होते ते कधीच कळत नाही. दोघांची मनं व मतं जुळली की मैत्री झालीच.मैत्रीत काय जादू आहे? मैत्री म्हणजे मुकी भावना, मनाच्या गोष्टी मनाला पोहचवणारी. मैत्रीचे  बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. मनाला जोडणारी मैत्री, हे एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कुणी वाटत असेल तर तो म्हणजे मित्र. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो!

मैत्री म्हणजे एक रोपट असतं जे जमीनीत पुर्णपणे रुजलेल असतं.जमिनीवर दिसत त्याच्या दुप्पट जमिनीत असतं ज्याचा गाभा शोधण केवळ अशक्य असतं. “पाणी रे पाणी तेरा रंग कौसा” हे कधी कुणी सांगू शकेल का? तसचं मैत्रीच आहे. ती कशी असते, कधी होते, कुणासोबत व का होते? हे कुणालाच कधीच कळत नाही. पण जेव्हा मैत्री होते तेव्हा मात्र आपण वेगळेच कुणीतरी होऊन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात तरंगत असतो. मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचच बंधन रहात नाही. मैत्री एक हळुवार कोमल संवेदना आहे.याला शब्दात बांधण कठीण आहे व बांधण्याचा प्रत्यत्न करु नये. खरचं ज्या नात्याला उगम नाही ज्याचा जन्मच नाही तरीही हे नात इतक दृढ का होतं?

मैत्री अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,सुख दु:खात साथ देणारी, संकटात दिलासा देणारी, न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी,जीवाला जीव लावणारी,काळजी घेणारी,साद घातल्यावर धावत येणारी व प्रेमळ हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणारी.

लहानपासून वाढत्या वयाप्रमाणे आपल्याला नवे  मित्र मिळत जातात.पण सर्वांशी मैत्री कायम राहते. ती आयुष्यभर पुरते.मैत्री हि अशी सहज विसरता येत नाही. जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्याचं मोल करता येत नाही, त्यापैकी एक म्हणजे मैत्री. मैत्री हा अनमोल ठेवा आहे.अखंड विश्वाची अनुभूती म्हणजे मैत्री होय.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते. मैत्री म्हणजे माणसाने कुटुंबापलिकडे बनवलेलं पहिलं आणि एकमेव नातं. माणसाला वैयक्तिक आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची अशी ही दोनच नाती.या दोनपैकी माणसाला जास्त महत्त्वाचं नात कुठलं तर ते मैत्री. कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे मैत्री होय. जेवढं रक्ताच्या नात्याजवळ व्यक्त होता येत नाही तेवढं आपण या रेश्मी बंधात व्यक्त होतो. म्हणूनच की काय रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात. 

फ्रेंडशिप, रिलेशनशिप हे इंग्रजी शब्द थोडा वेळ बरे वाटतात ऐकायला; पण थेट हृदयाला स्पर्श करतो तो शब्द म्हणजे ’मैत्री’. या शब्दांचा गोडवा कायम ठेवण्यासाठी, मित्रांशी असलेलं नातं आणि नात्यांमधली मैत्री जपण्याकरता आपण मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी काय फरक पडतो? मनापासूनची ओढ असेल तर सारं काही शक्य होते.

एक मैत्री कधीही न विसरता येणारी गोड आठवणीतली...... नेहमी ह्रदयाच्या कप्पात साठवलेली.

Tuesday, July 28, 2020

ओढ भेटीची




                                                       ओढ भेटीची


खूप दिवसात मित्रमंडळींची व नातेवाईकांची भेट झालेली नसल्याने सर्वांना एकमेकांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली आहे.प्रत्येकजण फोनवर, व्हिडीयो कॉलवर किंवा चॅट करतो तरी देखील सर्वजण एकत्र भेटण्यासाठी आतुर झालेले दिसतात.प्रत्येकाला भेटीची ओढ लागलेली दिसते.ही प्रतिक्षा कधी संपणार? आपण कधी भेटणार अशी सारखी  विचारणा होत आहे.प्रियजणांना प्रत्यक्ष भेटण्याची मजा काही औरच असते नाही.. 

मनात असलेली भेटण्याची अंतरीक ओढ व मनात होत असलेली घालमेल प्रत्येकजणा बोलून दाखवत आहे. आठवणीवर सगळे जगत आहेत. मित्रांना भेटण्याची ओढ,प्रेमी प्रेमिकाला भेटण्यास आतुर, महिलांची मैत्रिणींना भेटण्याची इच्छा,ज्येष्ठांना आपल्या मित्रांची आठवण येत असल्याने भेट घेणे गरजेचे झाले आहे. सर्वात जास्त लहान मुलांना त्यांच्या संवगड्यांच्या भेटीपासून दूर ठेवणे पालकांना कठीण जात आहे. जवळचे मित्र व नातेवाईक यांच्याशी फक्त फोनवर बोलून समाधान होत नाही. त्यांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यात जो आनंद मिळतो तो फोनवर नसल्याने अनेकांची नाराजी आहे.

बदलत्या काळानुसार जडणघडण बदलत आहे पण भावना मात्र त्याच आहेत यात शंका नाही.प्रत्यक्ष भेटता येत नसलं म्हणून ऑनलाइन माध्यमांचा वापर करून भेट घडवली जात आहे.वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत.ऑनलाइन भेटी होत असल्या तरीही  भेटण्याची इच्छा कमी न होता ती सतत वाढत आहे. मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे सोशल लाइफ सुद्धा पूर्णपणे विस्कटले आहे. तरुणाईचा जास्तीत जास्त वेळ हा इंटरनेट वर वाया जात आहे.तंत्रज्ञानाचा उपयोग करून मैत्री जपण्याच्या आजच्या पिढीचा मार्ग जरी सोपा असला तरी प्रत्यक्ष मित्रांची भेट घेण्याचा आनंद वेगळाच आसतो.

भेट हेत नसल्याने मानसिक तणावाखाली प्रेमभंग झाले आहेत. ज्येष्ठ मंडळी आजारी पडली आहेत. पर्यटन नसल्याने पर्यटक भ्रमिष्ठ झाले आहेत.महिला वादावादी विसरल्या आहेत. लहान मुलं मोबाईलचा गेममध्ये गुंतली आहेत. व्यसन करणा-यांना एकट्याने व्यसन करायला लागणे हे मोठे दू:ख झाले आहे.काही सण साजरे झाले तेही घरातल्या घरातच आणि आपल्या कुटुंबातच.कोणाला भेटताही आले नाही. कौटुंबिक सोहळे देखील ऑनलाईन साजरे झाले. भेटणे दूरच राहिले.  


ब-याच वर्षांनी, एकत्र काम केलेले आणि आता लांबलांब राहणारे आम्ही मित्र परवा ऑनलाईन भेटलो. पूर्वी केलेल्या मस्तीच्या आठवणीने सर्वजण सुखावले.त्या सोनेरी दिवसांची आठवण काढीत जुने क्षण जिवंत केले. काही मित्रांची आठवण काढली. पुढच्या भेटीत त्यांनाही सामिल करणार आहोत. या ऑनलाईन भेटीने सुखावलो पण मन भरले नाही. म्हणुनच आम्ही प्रत्यक्ष भेटणार आहोत.  
निकटवर्तीयांसोबत सुख दु:खाच्या शेअरिंग साठी प्रत्यक्ष भेटणे जरुरीचे झाले आहे.  

आपण भेटीची वाट पाहत असलो तरीही अजून काही दिवस प्रत्यक्ष भेटण्याचा मोह आवारला पाहिजे. 

Sunday, July 26, 2020

परीक्षा व निकाल

  • परीक्षा व निकाल 
  •  
  • प्रथम परिक्षा व नंतर निकाल.प्रत्येक परिक्षेला निकाल असतोच.परीक्षेपेक्षा निकाल महत्वाचा असतो. या निकालाने त्या विद्यार्थ्याचे भवितव्य ठरत असते. निकाल काय लागेल याचा ताण विद्यार्थ्याच्या मनावर सतत असतो.हा निकाल इतरांसाठी अभिनंदन करण्यासाठी किंवा नापास झाल्यास सहानुभूती दाखवण्यासाठी फक्त असतो. परिक्षेचा निकाल त्या विद्यार्थ्यी, त्याचे पालक व त्याच्या घरासाठी अत्यंत महत्वाचा असतो. पुढची वाटचाल ठरवणारा व दिशा दाखवणारा हा निकाल आयुष्यात मोठा बदल देखील घडवणारा ठरतो.निकालानंतर काही विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होताना दिसतात तर काहीनी आकाशाला गवसणी घातलेली दिसते. हा निकाल विद्यार्थ्याला कोठे घेऊन जाईल ते त्यावेळी त्या विद्यार्थ्यालाही माहित नसते.या निकालानंतर काहींना पूरस्कार व बक्षीसं मिळतात.मुलाखती होतात.काहींना चांगल्या कॉलेजमध्ये दाखल होण्याची संधी मिळते. तर काही निकालानंतर जग सोडून जातात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीनुसार त्याचा निकाल लागत असतो. निकालापेक्षा विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तुत्वाला महत्व दिले पाहिजे व कर्तुत्वावर विश्वास ठेवले पाहिजे.       

  • विद्यार्थ्यांना निकालाचे महत्व निकाल लागल्यानंतरच खरं कळतं.विद्यार्थीदशेत असताना विद्यार्थ्यी निकालाबद्दल विचार करीत नाही,ही मोठी चुक करतो. ज्या विद्यार्थ्यांला निकालाचे महत्व अगोदरच कळतं तो त्या दिशेने तयारी करीत योग्य निकाल आपल्या खिशात घालत असतो.

  • लाखो विद्यार्थी व पालक परीक्षेच्या निकालाच्या तारखेकडे लक्ष लावून असतात.वर्षभर अभ्यास करुन दिलेल्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याची प्रगती कळते. अभ्यास मनापासून करणारे विद्यार्थी परिक्षेत पास होतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारे विद्यार्थी परिक्षेत अयशस्वी होतात.परिक्षेच्या काळातच अभ्यास न करता वर्षभर नियमित अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची प्रगती दिसते. विद्यार्थ्यांना जीवनातील विशिष्ट ध्येय गाठण्यास परिक्षा द्याव्याच लागतात. परीक्षेत मिळालेले उत्तम यशच विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात कारणीभूत ठरते.

  • परीक्षा म्हटलं की थोडी भीती वाटणे व ताण येणे स्वाभाविक आहे. परंतु वेळेचे व्यवस्थापन, नियोजनबद्ध अभ्यास व तब्येतीची काळजी घेऊन आत्मविश्वासाने विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. शैक्षणिक करियरमध्ये यश मिळवायचं असेल तर आपण ज्या परीक्षा देतो त्यामध्ये चांगले गुण मिळवणे आणि अव्वल दर्जाने उत्तीर्ण होणे गरजेचे असते. अर्थातच, अव्वल येण्यासाठी अभ्यास करणं, तो लक्षात ठेवणं आणि परीक्षेत तो नीटपणे मांडणं तितेकचं महत्वाचं असतं. हे ज्या विद्यार्थ्याला जमलं तो कायम यशस्वी होत जातो.

  • आपल्याला जर सुखी जीवन जगायचे असेल तर परीक्षेत प्राविण्य मिळविणे गरजेचे आहे.शिक्षणाद्वारे समाजात नावलौकिक, आदरसन्मान मिळून जीवनात समाधान मिळते.परीक्षा आणि परीक्षांच्या निकालाच्या काळात घडणार्‍या आत्महत्या आणि नैराश्य यांना हद्दपार करण्यासाठीच परिक्षांना आपल्या जीवनातील एक सण-उत्सव समजावे.

  • आयुष्यभर माणसाला परिक्षा देत राहावे लागते.निकालाची वाट पाहत असतानाच दुस-या परिक्षेची तयारी करत जीवन जगावे लागते.

Thursday, July 16, 2020

खिडकीत रमलेली मुलं

खिडकीत रमलेली मुलं 

हल्ली मुलं कोठेच दिसत नाहीत. मुलं गेली कोठे? ह्या जगात मुलं नव्हती असे वाटायला लागलं आहे.गेल्या तीन महिन्यात लहान  मुलं दिसलीच नाहीत.घरात बंदीस्त झालेली आहेत. बगीचे ओस पडले आहेत.बिचारी खिडकीत बसून बाहेरच जग पाहत असतात. हे द्द्श्य पाहायला खूप वाईट वाटते.देवा ह्या मुलांना अशी शिक्षा का दिलीस? मुलांची शाळा संपली, परीक्षा झाली नाही, सुट्टीही संपली आणि नव्याने शाळा सुरु झाली तरीही मुलं घरातच आहेत.हे सगळे मुलांनी घरातच राहून अनुभवले. 


मुलं म्हणजे फुलपाखरं ,त्यांना हवं तसं उडू द्यावं, त्यांच्या पंखांत लपलेलं आभाळ, त्याचं त्यांना शोधू द्यावं. मुलं म्हणजे निखळ हास्य, चैतन्य व उत्साहाचे झरे. प्रत्येक लहान मूल अत्यंत निरागस आणि निष्पाप असते. लहानपण हे खरंच सुंदर आणि निरागस असते. लहान मुलांचे विश्वच खूप वेगळे असते. 

आईबाबा बाहेर सोडत नाहीत.संवगडी भेटत नाहीत व दिसतही नाहीत.बागडणारी मुलं कोडली गेली आहेत.शाळा नाही,मॉल नाही,हॉटेल नाही,चित्रपट नाही,पिकनिक नाही,काहीच नाही.फक्त घर ऐके घर. काय हे मुलांच विश्व? त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करता येत नाही,हे मोठे दु:ख आहे.खायला देखील रोज विशेष नसतं.केव्हातरी शेजारच्या मित्राबरोबर खिडकीतून किंवा गॅलरीतून गप्पा होतात..मुलांच्या आईबाबांनी या मुलांना समजावून थोपून धरले आहे. किती गेम खेळणार? किती चित्रपट पाहणार? किती छंद जोपासणार? घरात एकच मुलं असेल तर त्याची कुचंबणा जास्त होते. मुलांना त्यांच्या बरोबरच्या मुलांबरोबर खेळायला व मस्ती करायला मिळत नसल्याने आंनदी नाहीत.आईबाबा तरी किती वेळ खेळणार? थोड्या वेळाने ते त्यांच्या मोबाईलमध्ये आम्हाला विसरून जातात. मग लहान मुलं आजीआजोबांची सोबत शोधतात. काही पालकांनी मुलांशी संयमाने वागत चांगल्या पद्धतीने नात विकसित केले आहे. मुलाचे लहानपण सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आजचे पालक अगदी मनापासून जीवतोड प्रयत्न करतात. मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांचा वेळ, लक्ष, संवाद आणि प्रेम या अत्यंत महत्त्वाच्या चार गोष्टींची गरज आहे.    


घराची खिडकी हे मुलांच्या आवडीचे ठिकाण झाले आहे.तेथेच बसून असतात.बाहेरची हालचाल न्याहळत असतात.त्यांचा एकटेपणात घालवण्यासाठी खिडकी जणूकाय त्यांची मैत्रिणी झाली आहे. खिडकीतच जेवतात. पक्षांचा खायला घालतात. पक्षांशी बोलतात. वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर झेळतात.खिडकी बसून जग पाहत असतात.मुलांच ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्याने त्यांचा थोडा वेळ त्यांचा ऑनलाईन अभ्यास जातो.पण वर्गातील मजा घरात येत नाही. मुलं घरात बंदीस्त असल्याने चिडचिडी झाली आहेत.  


खेळण्यांविषयी लहान मुलांना एक वेगळंच आकर्षण असतं. ही खेळणी म्हणजे या लहान मुलांची निरागसता होती. ती खेळणी  खेळताना मुल दिसत नाहीत. अलिकडे मात्र या खेळण्यांची जागा डिजीटल खेळण्यांनी घेतल्याने मुलं घरात पडलेली असतात. मुलं मोबाईल किंवा संगणकावरच्या खेळात गुंतली की पालकांना कमी त्रास होतो. मुलांनी मोबाईल, व्हिडिओ गेम्स सारख्या खेळांकडे न वळता निरागसता जपणारे खेळ खेळावेत.


खरंतर उन्हाळ्यातील सुट्टी म्हणजे बच्चे कंपनी साठी मौज मस्ती करण्याचे दिवस पोहणे, मामाच्या गावाला जाणे,खेळणे,खूप गप्पा मारणे, मित्राशी भांडणे आदी चा आनंद घेण्यासाठी मुलं या सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतात पण हे सर्व मृगजळच ! या सर्वांवर कोरोना या महमारीने पाणी फिरवले आणि सर्व काही लॉक डाऊन झाले.

डॉक्टर व परीचारीका,पोलिस यांना आपल्याला मुलांना भेटता देखील येत नाही.हे तर खूपच दुःखदायक  आहे. 

लहान निरागस मुलांना या महामारीचे काय गांभीर्य!
पण यावर्षी त्यांचा सर्व आनंदावर पाणी फिरल्याने दु:ख झाले आहे.

Sunday, July 12, 2020

एक दिवस



एक दिवस

गाड्यांच्या हॉर्नने जाग आली.घरात किचनमध्ये गडबड सुरु होती.ऑफिसला जायला उशिरा होऊ नये म्हणून लवकरच तयारीला लागलो. चहा पित असताना पेपर वाचला. दोन दिवस पाऊस पडणार नसल्याचे भाकीत होते. माझी तयारी झाल्यावर सगळ्या गोष्टी घेऊन  बाहेर पडलो.सोसाय़टीतल्या वॉचमेनला सुचना दिल्या व निघालो. बाहेर रस्त्यावर रिक्षासाठी  व बससाठीही मोठ्या रांगा लागल्या होत्या.एवढी गर्दी कोठून आली.ऑफिसला जाणारे,पाठीवर सॅक घेतलेले कॉलेजवीर,मुलांना शाळेत सोडण्यास आलेल्या महिला.जरीच्या साड्या नेसून लग्नाला निघालेल्या महिलामंडळ, आजी देवळात तर आजोबा दवाखाण्यात निघाले होते व त्यातच रस्त्यावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडलेले होते. 

रिक्षात बसल्यावर रिक्षा वाहतुकीतून वाट काढत काढत पुढे सरकत होती. आजही आपल्याला उशिर होणार असे वाटू लागले.तेवढ्यात रिक्षाने स्टेशन गाठले.गाड्या उशिरा घावत असल्याने प्लॅटफॉर्मवर गर्दी ओसडत होती. तीनचार गाड्या सोडल्यानंतर कसातरी गाडीत घुसलो. नेहमीची गाडी न मिळाल्याने मित्र नाराज झाले. त्या गाडीतल्या मित्रांनी खाण्याचे पदार्थ आणल्याचे व तसेच येत्या रविवारी कर्जतला रिसॉर्टवर पिकनिक ठरवल्याचे फोनवरून सांगितले.गाडीत गर्दी खूप असल्याने घुसमटायला झाले. घामाच्या धारा लागल्या होत्या. ’दादर’नंतर श्वास घेण्यास मिळाले. चर्चगेटला उतरल्यावर गर्दीतून बाहेर पडण्यास बराच वेळ गेला.पुढचा प्रवास बसमधून उभ्याने करीत ऑफिसला पोहचलो.

धावत पळत कसतरी मस्टर गाठलं होतं.पाच मिनिटे बसून श्वास घेतला नाही तोपर्यत साहेबांचे बोलवणं आलचं.साहेबांना भेटून आल्यावर चहा व नास्ता केला आणि कामाला लागलो. खूप वर्षे एकत्र काम केलेला माझा सहकारी निवॄत होत असल्याने आज ऑफिसमध्ये गडबड होती.दुपारी जेवण व नंतर निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला.त्यातच कामही सुरु होते.घरचे व मित्रांचे फोन घेत होतो. सेवानिवृत सहका-याला भेटण्यात वेळ गेल्याने संध्याकाळी निघण्यास उशिर झाला.गाडीत बरीच गर्दी होती. पण गाडीत बसायला व त्यातच विंडो सिट मिळाल्याने सुखावलो.प्रत्येक प्रवाशी मोबाईमध्ये व्यस्त होता.काही चित्रपट तर काही मॅच पाहत होते.काहींनी गाणी ऐकत प्रवास सुरु केला.पुढच्या प्रत्येक स्थानकांवर गाडीत गर्दी होत गेली.मला मात्र गर्दीतून बाहेर उतरण्यास बराच त्रास झाला.गाडीतून मला बाहेर फेकून दिले होते.पडता पडता स्वत:ला सावरले होते.

स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर वाहनांची व माणसांची बरीच गर्दी होती. भाज्या व इतर गोष्टींची खरेदी करीत व गर्दीतून वाट काढीत सोसायटीत पोहचलो.सोसायटीत मंडळी माझी वाट पाहतच होते.बॅग घरी पाठवून दिल्यानंतर सोसायटीतील काम करण्यात बराच वेळ गेला.सोसयटीतील प्रश्न सोडवून घरी गेल्यावर फ्रेश होऊन सरळ जेवायला बसलो.जेवतानाच संपूर्ण दिवसाचा आढावा घेतला. टि.व्हि.वर बातम्या पाहिल्या.पोस्टाने आलेली सोसायटीची पत्रं पाहिली. काही फोन घेतले व केले. आईबाबांची विचारपूस केली व उद्याची तयारी करून लवकरच झोपलो.         

अचानक एका दिवसाची आठवण झाली. काय होते ते धावपळीचे जीवन? विचार करायला जराही वेळ मिळत नसे.पुढच्या दिवसांचे नियोजन झालेले असायचे.सर्वांचे जीवन धावपळीचे झाले होते.

आता...........   

Sunday, July 5, 2020

मस्त पाऊस बरसला.




                                                           मस्त पाऊस बरसला.

ब-याच दिवसांनी वेगळाच वीकेंड  गेला. दोन दिवस पावसाने धुवाधार बॅटिंग केली.मस्त कोसळत होता. हवेत गारवा आला.एकदम सगळीकडे शांतता पसरली आहे.पाऊस आपल्याच सुरात मस्त गात होता. थोडा पाऊस पडला की मुंबईकराला घरी कसे पोहचणार याची काळजी असते.काही जण घरून कामे करत आहेत. तर काही घरातच आहेत.ठराविक कार्यालय सुरु आहेत.शाळा व कॉलेज बंद असल्याने बच्चे कंपनी व तरुणाई घरीच आहेत.कालचा पाऊस सर्वांनी घरातूनच कुंटुबासोबत अनुभवला. आपल्याला हवाहवासा व आपलासा वाटणारा पाऊस सुरु झाला आहे.रिमझिम पाऊस व त्याचे खिडकीवर उडालेले थेंब जेव्हा काचेवरून घरंगळत खाली येतात ते पाहण्यासारखे असते.रिमझिम पावसाने आपली हजेरी लावली आणि मन प्रसन्न झाले.खूप दिवसांनी असा मस्त पाऊस पडताना आज इतकं निवांत बघता येत होतं.     
 
घामाच्या धारांनी त्रस्त झालेले आपण कधी आकाशात काळे ढग जमतात आणि कधी पावसाच्या सरी बरसतात याची आतुरतेने वाट पाहत असतो. मग एकदा का पाऊस कोसळायला सुरुवात झाली की, मातीचा सुगंध आणि हवेतील गारवा आपल्या मनाला आनंद देऊन जातो आणि सुरुवात होते ती खमंग पदार्थांची. पाऊस आणि वाफाळता चहा, गरमागरम भजी हे समीकरण पिढ्यानपिढ्या रुजलंय. लोकांनी गरम गरम कांदा भजी व वाफाळलेल्या चहाची लजत लुटली.



मस्त भिजणारी प्रेमजोडी… एका छत्रीतून जाणारी ती दोघं… साचलेलं पाणी… त्यात सोडलेल्या कागदाच्या होडय़ा… आणि… मस्त भाजलेलं मक्याचं कणीस… गरमागरम कांदा भजी… तिखटसर मसाला चहा...गाडीने अंगावर उडवलेले पावसाचे पाणी... आणि अक्षरशः बरच काही.....

पाऊस पडला की कोणी बाईक काढून मस्त भिजत लाँग ड्राईव्हला जातं, तर कोणी प्रेयसीसोबत समुद्रकिनारी जाऊन दगडांच्या आडोशाला हा पाऊस अनुभवत असतं. काहीजण हा पाऊस फक्त घराच्या खिडकीतून अनुभवतात, तर काही लांब डोंगरावर जाऊन.तर वयस्कर जुन्या आठवणी काढतात. लहान मुल तर पावसात भिजून वेडी होतात. प्रत्येकाची पाऊस अनुभवण्याची वेगळी त-हा असते. पाऊस म्हटलं की ओले चिंब होण्याचा आनंद. मनाला ताजेतवाने करणारी थंड हवा आणि हिरवागार निसर्ग बघून मन प्रसन्न होते. पावसात भिजण्याची मज्जाच काही वेगळी आहे.

मुंबईत काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याच्या बातम्या होत्या.अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. शहरात पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. त्या नेहमीच्या झाल्याने त्या महत्वाच्या नव्हत्या.रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. त्याचबरोबर काही ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडून नुकसानही झाले.दोन्ही रेल्वेसेवा सुरु होत्या.   

पावसाचा आनंद शेतकऱ्यांना होतो.पेरणी होऊन लावण्या सुरु झाल्या आहेत.अशावेळी पावसाची गरज असते.त्याच वेळी पाऊसाने हजेरी लावण्याने शेतकरी सुखावला आहे.पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्या लोकांनाच जास्त होतो. 


पावसामध्ये मुक्त भिजण्याचा आनंद न घेता आल्याने तरुणाई नाराज दिसली.. 

Friday, June 26, 2020

कधी होणार यातून सुटका?

                                          कधी होणार यातून सुटका?


करोनाचा संसर्ग वाढू नये.याकरीता तीन महिने घरात बंदिस्त राहून सगळेजण कंटाळले आहेत. विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.अनलॉकमुळे जरुरीचे व्यवहार सुरु झाले आहेत.पण गरजेचे असेल तेव्हाच माणसं घरातून बाहेर पडत आहेत. ’एप्रिल’ नंतर ’मे’ नंतर ’जून’ पासून या विषाणूचा जोर कमी होईल असे भाकित केले गेले.या आशेवर लोकांनी वाट पाहिली पण विषाणूचा कमी होण्याचा विचार नसून त्याचा संसर्ग वाढत आहे.टाळेबंदी उठली तरी या चिंतेच्या चक्रातून सुटका झाली नाही.     

जगाला लागलेले हे ग्रहण कधी सुटणार? संकट कधी दूर होणार? या समस्यातून कधी सुटका होणार? असे सर्वांना वाटत आहे. काय करायचं काहीच सुचत नाही. अद्याप यावर कोणतेही औषध अथवा लस उपलबद्ध नसल्याने यातून आपली सुटका कशी व कधी होणार? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.पण सध्याची घडी मात्र अशीच न राहता ती कधी एकदा बदलेल याची सर्व जण आतुरेतनं वाट पाहात आहेत.

पूर्वीचे आपले दिवस सारखे डोळ्यासमोर येत आहे.तसा आंनद घेता येत नाही. कायम भितीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे.कोणाकडे जाता येत नाही तर कोणाला घरी बोलावता येत नाही.अशी विचित्र पंचाईत झाली आहे.सगळे सण घरातच साजरे केले. सगळे कार्यक्रम रद्द झाल्याने कोणाचीही भेट होत नाही.ऑनलाईन भेटण्यास आता मजा राहीली नाही.घरातील सर्व लहानथोर मंडळी घराबाहेर पडण्याचा आग्रह धरीत आहेत.कोणावरतरी संतापून आपला सगळा राग काढण्याचा प्रकार होत आहे. दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरू होतील,पण त्यांची घडी बदललेली असेल. आपले काही व्यवहार सुरळीत होतील, तर काही होणार नाहीत. काही थोडय़ा, तर काही दीर्घ काळाने सुरळीत होतील असे वाटते आहे. 


काही बातम्या नक्किच दिलासादायक ठरल्या आहेत.कोरोनाने आपल्याला काही धडा दिला असेल तर तो म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याचा दिला आहे.कोरोनाने जे संकट उभे केले आहे ना, ते लक्षात घेता भविष्यात अशी जी काही संकटं येतील, त्यांचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे ही काळाची गरज आहे.आपल्याकडे आयुषमान भारतामध्ये योजना लागू आहे. ती अधिक परिणामकारक रीतीने राबविण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणात असावी, जेणेकरून तिची अंमलबजावणी करताना योग्य तो समन्वय राखला जाईल. सध्या आपल्या देशात प्रत्येक राज्याची वेगळी आरोग्य यंत्रणा आहे. त्यामुळे केंद्र व राज्य यात समन्वय राखणे कठीण होत आहे आणि त्याचा फटका कारण नसताना गरजू रुग्णांना बसतो आहे. केंद्र सरकारने आयुषमान भारत योजनेअंतर्गत ही यंत्रणा देशव्यापी आपल्या हाती ठेवली, प्रत्येक नागरिकाचा आरोग्य विमा काढला आणि आरोग्य सुविधा पुरविल्या तर कोणत्याही नागरिकाची अडचण होणार नाही. यामुळे समाजातील असुरक्षिततेची भावना नाहीशी होईल, आरोग्याच्या बाबतीत भीतिमुक्त समाज उभा होईल.

कुठलाही काळ, मग तो अनुकूल असो वा प्रतिकूल, कायमस्वरूपी तसाच राहात नाही. तो बदलत असतो. पुढे अधिक चांगलं घडेल, हा आशावाद मनुष्याला जगण्याची उमेद देत असतो. सध्याच्या अवघड काळातही उमेद वाढू शकेल अशा अनेक घटना आजूबाजूला घडत असतात. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं, तर आशावाद जागता ठेवता येईल.

आपल्याला सुरक्षित ठेवून सुटका कधी होणार याची प्रतीक्षा करणे हा एकच मार्ग राहीला आहे. 

Wednesday, June 24, 2020

मन अधीर झाले.

                                                    मन अधीर झाले.
 
गेल्या दोन ते अडीच महिन्यात प्रेमिकांना एकमेकांना भेटता न आल्याने विरह वाढत गेला आहे.प्रेमीयुगुलांचा मुक्तसंचार थांबला होता.रोज भेटणारी ती व भेटणारा तो न भेटल्याने प्रेमी त्रासलेले आहेत. बसस्टॉप, बसमध्ये, कॉलेज, ऑफिसमध्ये तर कॅंन्टिनमध्ये भेट व्हायचीच.आता कधी एकदा भेटायला मिळेल याची दोघेही चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.मनाची घालमेल वाढली आहे.किती दिवस मेसेज व व्हिडियो कॉलवर समाधान मानायचे? प्रेम ऐन बहारात असताना हे संकट आले आणि यांचे प्रेम दुरावले. त्याला आणि तिला भेटण्यासाठी मन अधीर झाल्याची मनस्थिती या प्रेमिकांची झाली आहे.जिवलगाच्या ओढीने जीव व्याकुळ झाला होता.

विरहामुळे जीवनात एक हरवलेपण येते, स्वत:चे भानच राहत नाही. तुला लगेच येऊन भेटावसं वाटत होतं पण ते शक्य नव्हतं,  असे तीला वाटत होतं. इतके दिवस विरहात घालविल्यामुळे भेटीची अपूर्वाई इतकी वाढली होती की, बाकी सगळे दुय्यम झाले आहे. इथून पुढे कुठे व कसे भेटायचे, नियती साथ देईल की नाही? अशी बेधुंद व  मनस्वी मनस्थिती निर्माण झाल्यासारखं, त्याला वाटत होतं.

खरे तर विरहात दोघेही एकमेकांना दोष देत नव्हती.वेळ तशी आली होती.पण भेट झाल्यावर मात्र मूळचा प्रेमाचा झरा खळखळ वाहू द्यायच असे दोघांनी ठरवलं. जे प्रेम  हरवले होते आणि ब-याच दिवसांनी पुन्हा गवसेल. प्रेमात विरह आल्यानंतर अनेकदा प्रेम संपत असे नाही तर प्रेम आणखी वाढतं. विरहानंतरची त्या भेटीत शब्दाविण तनामनाचा संवाद होत राहील.कित्येक दिवसांची तुझ्या भेटीची मनात असलेली आस लागून राहीली आहे.स्वप्नात का होईना रोज दोघे भेटत होती.पण जाग आल्यावर नाराज व्हायची.जाग येऊच नये असे वाटायचं.स्वप्न कधी खरी होणार याची वाटत होती.    

प्रेयुगलांची मात्र पंचाईत झाली. लॉकडाऊनमुळे इतर जनजीवन ठप्प झाले होतेच,  त्याच बरोबर प्रेमीयुगलांच्या चोरीछुपे भेटीही बंद झाल्या. लॉकडाऊनमुळे या वर्गाकडे कोणाचे लक्ष राहिले नाही. बागबगीचे व समुद्र किनारे बंद झाले.घराबाहेर पडण्याचे बहाणे देता येत नव्हते.दोन ते अडीच महिन्यांच्या दिर्घ विरहानंतर प्रेमीजन एकमेकांना भेटण्याची संधी मिळणार आहे.इतक्या दिवसांच्या विरहानंतर भेट झाल्यानंतर दोघांच्या भावनांचा बांध सुटेल.त्यावेळी आंनदाचे अश्रू अनावर होतील. 


विरहानंतर तिला त्याची व त्याला तिची भेट झाल्यावर एकमेकांशिवाय गेलेल्या काळाविषयी काय काय व किती सांगू असं काहीसं दोघांचं झालं होतं. इतक्या दिवसांच्या विरहानंतर आपलं माणूस आपल्या समोर असताना दोघांना काहीच सुचत नव्हतं.नुसते एकमेकांना पाहत बसले होते.

तुला न भेटता जाणारे ते दिवस मला कधीच आवडत नव्हतं
तुझे हसणं न दिसल्यानं माझे आयुष्य पुढे सरकत नव्हतं


प्रेम म्हणजे प्रेम असतं,तुमचं आमचं सेम असतं ...


Tuesday, June 16, 2020

सायबर गुन्हे




                                                             सायबर गुन्हे 



लॉकडाऊनच्या काळात इतर गुन्हे कमी झाले पण सायबर गुन्हे खूपच वाढले व वाढत आहेत.हेच भयानक आहे.स्मार्टफोन हातात आल्यामुळे प्रत्येकजण ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देऊ लागला आहे. पण, सायबर चोरटे वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांना फसवू लागले आहेत.काही गुन्हेगार आणि समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकाराने फसवत असल्याने त्यांना पकडणे कठिण जात आहे.यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये.सध्याच्या काळत इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर भामटे वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करुन ज्येष्ठ नागरिकांना फसवित आहेत. कधी ते नागरिकांना खोट्या ऑफर्सच्या मोहात पडून एखादे अ‍ॅप डाऊनलोड करायला लावतात व नागरिकांच्या फोनचा ताबा मिळवतात.तसेच एखाद्या लिंकवर क्लिक करायला लावून बॅक खात्यातील पैसे लुटत आहेत.

सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच व्हाटसअॅप मेसेजेस फिरत आहेत. या मेसेजेसमध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी किंवा कोणत्याही वेबसेरीजचे सब्सक्रिप्शन स्वस्तात आहे खालील लिंकवर क्लिक करा, असा मजकूर असतो आणि एक लिंक दिली असते. आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये. कारण सदर लिंक्स आणि मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे.

आज सायबर गुन्हे वेगाने वाढत असताना नागरिक मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. सायबर गुन्ह्यांमुळे अनेकांचा पैसा डोळ्यांदेखत गायब झाला आहे. काहीवेळा आपणही या घटनेला जबाबदार असतो. कोणत्याही खोट्या कॉलला दिलेला प्रतिसाद हा आपल्याला आर्थिक अडचणीत आणू शकतो. यासंदर्भात सरकार आणि बँकांकडून वारंवार सूचना देऊनही लालसेपोटी, अमिषापोटी काही खातेदार बनावट मेलला बळी पडतात आणि नकळतपणे आर्थिक चक्रव्यूहात अडकत जातात. 

सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल कॉलद्वारे अधिकाधिक लक्ष्य केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल वापरण्याची माहीती कमी असल्याने ही मंडळी फसली जात आहे. आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन वापरता येणे अत्यावश्यक झालेले असल्याने ज्येष्ठ नागरिकांना हा स्मार्टफोन वापरण्याचा आत्मविश्वास मिळविला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी बॅकेचे व्यवहार ऑनलाईन करताना सावधानता बाळगली पाहिजे.आपल्या खात्याची कोणतीच माहीती कोणालाही देऊ नये.दुरध्वनी आल्यास  ज्येष्ठ नागरिकांनी बॅक खात्याची अथवा एटिएमची माहीती मोबाईलवर कोणालाच देऊ नये.

तुमचा ईएमआय स्थगित करण्यासाठी बॅकेकडून एक ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल.तो ओटीपी आमच्याशी शेअर केला तरच तुमचा स्थगित होईल.अन्यथा तुम्हाला ईएमआय भरावा लागेल.नागरिकांनी ओटीपी शेअर केल्यास त्यांच्या बॅक खात्यातून तात्काळ मोठी रक्कम काढून घेतली जाते.तेव्हा बॅककडून कधीच ओटीपी विचारला जात नाही.बॅकेबाबतची गोपनीय माहीती कुणाशीही शेअर केली नाहीत तरच तुमच्या खात्यातील रक्कम सुरक्षित राहील.

मी बँकेतून बोलतोय. तुमच्या एटीएम कोडचे नूतनीकरण करायचे आहे. जुना कोड सांगा, असे सांगून फोनवर गोड गोड बोलणारी तरूणी तुम्हाला बोलण्यात गुंतवून ठेवतेआणि इतर माहिती विचारून घेते. यानंतर पाच मिनिटांतच तुमच्या बॅंक खात्यातून पैसे काढल्याचे मोबाईलवर मेसेज येतो आणि तुम्हाला धक्का बसतो.तुम्ही गोंधळून जाता.त्यामुळे तुम्ही तातडीने बॅंकेच्या शाखेत जाता. मात्र, बॅकेचे अधिकारी तुम्हाला फसवणूक झाल्याचे लक्षात आणून देतात. मग तुम्ही पोलिस ठाणे गाठता. तिथे पोलिस दखल घेतीलच असे नाही. कारण सायबर क्राईम करणारे खूपच निष्णात असतात आणि अनेकदा त्यांचा भल्या भल्यांना शोध लावता येत नाही. आजपर्यंत देशात लाखो लोकांची ऑनलाईनद्वारे बॅंकेत पैसे काढून फसवणूक झाली आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान, यात तुमचाही नंबर लागू शकतो. काळजी घ्या.



हॅलो, मी बँकेतून बोलतोय.......लगेच सावधान व्हा.    
 

Sunday, June 14, 2020

व्यसनमुक्ती व व्यसनाधीन

                                                     व्यसनमुक्ती व व्यसनाधीन

मी काय व्यसनाधीन नव्हतो.पण व्यसन कधीतरी करीत होतो.लॉकडाऊनच्या काळात घरात बंदिस्त असल्याने व्यसन वाढले होते. सगळे साहित्य घरातच उपलब्ध असल्याने माझे व्यसन सुरु होते.पण साठा संपल्यानंतर व्यसनाची ओढ जास्त वाढली.मला व घरच्यांना त्रास होऊ लागला.काय करावे ते कळत नव्हते.रात्री झोप लागत नव्हती.लॉकडाऊन कधी संपले याची कल्पना नसल्याने आपले कसे होणार? याच विंवचनेत पडलेलो असायचो.काही दिवस धीर धरला.एक दिवस निश्चय केला यापुढे व्यसन करायचे नाही.बहुतेक हा लॉकडाऊन आपले व्यसन सोडवण्यासाठीच असल्याचे वाटले.दुकाने सुरु झाली तरीही मी तिकडे फिरकलोच नाही.आता लॉकडाऊन संपले तरीही मला आता व्यसन करावेस वाटत नाही.यापूर्वी मी व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी मात्र मी यशस्वी झालो.मला व माझ्या कुटुंबाला या लॉकडाऊनने हे मोठे बक्षीस दिले आहे.माझ्या व्यसनमुक्तीने माझी बरीच आजारपण दूर झाली.घरातले वातावरण शांत व प्रसन्न झाले.माझ्या कुंटुबातली मंडळी आंनदी झाली.माझ्या व्यसन करणा-या मित्रांना मी व्यसनमुक्तीचा सल्ला देत आहे.माझ्या आयुष्यातला हा मोठा बदल लॉकडाऊने दिल्याने लॉकडाऊन कायमचा लक्षात राहील.    

माझे व्यसन पहिल्यापासून सुरु होते.मित्रांसह पार्ट्या होत असत.व्यसन करायला मित्र असले की वेगळी मजा असते.अचानक लॉकडाऊन सुरु झाले.लॉकडाऊनमध्ये मित्र बरोबर नसल्याने एकट्यावर बसण्याची वेळ आली.त्यानंतर साठा संपल्याने पंचाईत आली.मित्रांकडे चौकशी केली.पण काहीच सोय न झाल्याने माझी बैचनी वाढली.कुटुंबात भांडणं झाली.मुलं धास्तावली व दुरावली.झोप येत नसल्याने आजारपण बळावले.अगदी शेवटी दुकाने सुरु झाल्याचे कळल्यावर मी माझा साठा भरुन टाकला.मग काय माझा माझ्यावर नियंत्रण राहीले नाही.या लॉकडाऊनमध्ये माझ्या सारखे बरेच जण व्यसन वाढल्याने व्यसनाधीन झाले.कार्यालयात कामावर हजर राहण्याची नोटीस आली.तब्तेत ढासळल्याने मला कामावर रुजु होता आले नाही.औषधोपचार सुरु झाले.या लॉकडाऊनने माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली.या लॉकडाऊनमध्ये कितीतरी कुटुंब उध्वस्त झाली आहेत.लॉकडाऊनचा समाजावर मोठा परिणाम झाला.   

सध्याच्या या परिस्थितीने दोघांच्या आयुष्यात मोठे बदल केले. एक सुधारला तर एक बिधडला. व्यसनाच्या दुष्परिणामाकडे ज्याने दुलर्क्ष केले तो व्यसनाधीन झाला व ज्याने व्यसनाच्या दुष्परिणामाकडे लक्ष दिले तो व्यसनातून मुक्त झाला.अनेकजण बऱ्याच वर्षांच्या सवयीमुळे मद्यपानाच्या आहारी गेलेले असतात तर कित्येकजणांना फक्त एकच घोट प्यायल्यानंतर मद्यपानाची ओढ लागलेली असते. बदलत्या जीवनशैलीत मद्यपान करणे, ही जवळपास एक फॅशनच झाली आहे. एक अनुभव घेण्यासाठी मद्य पिणारी व्यक्ति नंतर कशाप्रकारे मद्याच्या आहारी जाते, हे तिलाच समजत नाही आणि त्यानंतर तिला मद्यपानाची एवढी सवय होऊन जाते की, मद्यपान टाळणे तिला शक्य होत नाही. अतिमद्यपान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिचा समाजाला व कुंटुबाला कायम त्रासच होत असतो.कोणतेही व्यसन शरीराला घातकच असते. त्यापासून अनेक आजार उद्भवतात. तरीही लोक व्यसन करतात. धूम्रपानाप्रमाणे मद्यपानही शरीराला घातकच आहे. त्यापासून दोनशेहून अधिक आजार बळावतात.तरीही लोक मद्यपान का करतात? 

मद्यपान करणाऱ्या बहुतेक लोकांना त्याचा नकारात्मक परिणाम माहित असूनसुद्धा स्वत:ला दारू पिण्यापासून थांबवू शकत नाहीत.मद्यपानामुळे काम आणि करिअर,आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधावर परिणाम होतो.समाजाचा मद्यपान करणाऱ्यांकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलतो.    

व्यसन हे व्यसनच, मग ते कुठलेही असो, घातकच असते. रोग झाल्यावर इलाज करण्यापेक्षा रोगच होणार नाही, याबाबत दक्षता घेणे केव्हाही चांगले नाही का?



Tuesday, June 9, 2020

अनलॉक सुरु




                                                           अनलॉक सुरु



मुंबईमध्ये अनलॉक सुरु करण्यात आला आहे.थांबलेली मुंबई पुन्हा नव्याने सुरु झालेली दिसली.एका विषाणूने मुंबईला रोखले होते..मुंबईचा श्वास रोखला होता.मुंबईने आज ब-या दिवसांनी दिर्घ श्वास घेतला असणार.खर तर जेव्हा रेल्वेसेवा सुरु होईल तेव्हाच मुंबईचा वेग वाढेल. भूतकाळात रमणारी, वर्तमानाशी एकरूप होणारी आणि भविष्यकाळाला भिडणारी ! बदल हा या शहराचा स्थायीभाव आहे.  

लॉकडाऊन संपवून अनलॉक सुरु झाल्याने घरात अडकून पडलेली मंडळी एकदम मोठ्या संख्येने घराबाहेर पडली आहेत.रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत आहे.कार्यालयात वेळेत पोहचण्याची सर्वांचा प्रयत्न होता.रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने इतर वाहतुक सेवांवर ताण पडत आहे.उपनगरातून बरीच मंडळी आपल्या गाड्या व सोबत मित्रांना घेऊन निघाले आहेत.

सार्वजनिक वाहतुक सेवा नसताना देखील कार्यालयातून उपस्थिीत सक्तीची करण्यात येत आहे.दुकाने,हॉटेल,मंदीर व बेस्ट सेवा सुरु होत आहे.रेल्वे सेवा सुरु करण्याच्या विचार आहे.सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलिस बाधित असल्याने पोलिसबळ कमी पडत आहे. प्रवाशांच्या सहनशीलतेचा इतका कडेलोट झाला की सामाजिक अंतराचे नियमही धाब्यावर बसविले गेले. परिणामी उभ्याने पाच प्रवाशांची मर्यादा असूनही आठ ते दहा प्रवासी उभे राहून प्रवास करीत होते. तर एका आसनावर दोन-दोन प्रवासीही बसत आहेत.बस शिरताना शिस्त पाळली जात नव्हती.अगोदरच मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना प्रवाशांचे हाल झाल्याने नियमांचे उल्लंघन होत राहिल्यास करोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढू शकतो. लॉकडाउन संपला म्हणजे करोनाचा धोका टळला असे नाही. लॉकडाउनच्या अटी शिथिल होऊ लागल्या असल्या तरीही करोना व्हायरस आहेच. त्यामुळे शहरातील प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे.अशा परिस्थितीत काही दिवसात पावसाळा सुरु होत असल्याने नागरिकांना जबाबदारी घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल.  

नवीन बाधित आढळू नये, यासाठी सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर, विनाकारण घराबाहेर न पडणे, गर्दीची ठिकाणी टाळणे आवश्यक आहे. याबाबत शासन-प्रशासन सातत्याने जनजागृती केली आहे.पण नियमांचे पालन होत नाही.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टनसिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात आलेत आहे.मात्र जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना नागरीक गर्दी करताना दिसून आले.अशा गर्दीमुळे भविष्यात मोठे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसागणिक वाढतोच आहे.मात्र,तरीही देश अनलॉक करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली  आहेत.महाराष्ट्र सरकारनेही 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेतच.त्या नियमानुसार कार्यप्रणाली होत आहेत का? ते पाहायला कोणीच नाही? त्यामळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी घ्यायची आहे.सार्वजनिक क्षेत्रात वावरताना एक शिस्त आपल्याला असायला हवी.प्रत्येकाने नियमाचे पालन करीत आपली सुरक्षा जपत वावरले पाहिजे.

शासन-प्रशासन सातत्याने जनजागृती आपल्याला जागृत केले आहे.यापुढे करोना जात नाही तोपर्यत आपली स्वत:ची सुरक्षा आपण जपत जगायचे आहे.आपली सुरक्षा आपल्याच हाती ...




Sunday, May 31, 2020

सणवार आले व गेले.

                                                    सणवार आले व गेले. 

मागच्या काही दिवसात वेगवेगळ्या धर्मांचे सण सगळ्यांनी आपापल्या घरातच व कुटुंबातच साजरे केले.फोन  व सोशलमिडियावर फक्त शुभेच्छा देऊन सण साजरे केले.कोरोना संकटामुळे कोणतेही धार्मिक सण सार्वजनिकरित्या साजरे करता आले नाहीत. यावर्षी महाराष्ट्र दिन, कामगार दिन,गुडीपाडवा, रामनवमी, हनुमान जंयती,महावीर जंयती,आंबेडकर जयंती,रमझान ईद,पारसी नववर्ष व बुद्ध पौर्णिमा  असे बरेच सण व उत्सव आपल्या कुटूंबात साजरे करण्याची वेळ आल्याने सगळेच नाराज झाले.आपण भारतीय नेहमीच सण आंनदाने साजरे करतो.सणांची वाट पाहत असतो.सण साजरे करायला आपल्याला सुट्टी मिळते.आपण उत्सवप्रेमी आहोत.श्रीमंत व गरीब सगळेच आपापल्या ऐपतीप्रमाणे सण आंनदात साजरे करतात.यावर्षी  सण, उत्सव, पूजा,अर्चा,प्रार्थना, धार्मिक कार्यक्रम घरातच करावे लागले आहेत.महाराष्ट्रात कोणत्याही जाती-धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत, याची खबरदारी घेतली गेली. सणांची मजा घेता आली नाही.     

भारतात स्वातंत्र्यदिवस, प्रजासत्ताक दिन व गांधी जयंती हे तीन राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सणांची अगदी रेलचेल आहे. उत्तरेतील सण वेगळे, पूर्व-पश्‍चिमेकडील वेगळे आणि दक्षिणेकडील वेगळे. त्या प्रदेशातील लोकजीवनाचा ठसा त्या सणांच्या माध्यमातून उमटत असतो. देशाची स्वर्गभूमी म्हणून दक्षिणेचा उल्लेख केला जातो. 

या वेळी गुडी पाडव्याला शोभा यात्रा निघाल्या नाहीत.रामनवमी व हनुमान जयंतीला  देवळात दर्शनाला जाता आले नाहे.गुढीपाडवा, रामनवमी हे महत्वाचे सण व उत्सवही भाविकांविना साजरे झाले. मुस्लिम समाजाला पहील्यांदाच रमजान ईदमध्ये गळाभेट करता आली नाही. नमाज पठण घरीच करावे लागले. ख्रिस्ती समुदायाने ईस्टर घरातच साजरा केला.बौद्ध समाजाने आंबेडकर जयंती अगदी शिस्तबद्ध रीतीने घरीच साजरी केली.सर्व समाजांना याचे खूप वाईट वाटले.दु:ख झाले.अशी वेळ यापूर्वी कधीच आली नव्हती.

आपल्या संस्कृतीचा आणि वैभवशाली परंपरांचा आरसा म्हणजे आपले सण.भारतात संस्कृती, परंपरा, चालिरिती, आचार, विचार, उपचार, विधी यांमध्ये अनेक वैविध्य आहेत. भारतात विविध धर्मीय आनंदाने, गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. प्रत्येक धर्माच्या संस्कृती, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांमध्ये वैविध्य आहे.त्याचप्रमाणे आपल्याकडील चालिरिती, परंपरा, सण-उत्सव यांना केवळ धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे, असे नाही. तर निसर्ग आणि वैज्ञानिक महत्त्वही तितकेच आहे. नैसर्गिक ऋतुचक्रानुसार आपल्याकडे सण साजरे केले जातात.निसर्गाप्रमाणेच आपल्याकडे महिने, ऋतू, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. पूर्वीपासून चालत आलेले सण-उत्सव आजच्या आधुनिक काळातही शहरी भागात,तितक्याच आनंदाने साजरे केले जातात.प्रत्येक सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते. प्रत्येक धर्मातील प्रत्येक सणाच्या आनंद सोहोळ्याची परंपरा पुढे चालविण्यासाठी प्रत्येकजण आपल्या लहान मुलांची व तसेच तरूणाईची तयारी करून घेत असतो.हे सण साजरे करताना आणि त्यांची तयारी करताना अनेक गमतीजमती घडत असतात.त्या आठवणी सुखद असतात.वर्षभर शेतामघ्ये काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या सर्जा-राजाच्या प्रति श्रद्धा व प्रेम व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांचा पोळा सणाला फार महत्वाचे स्थान आहे.

सण साजरा करण्यामागे मात्र घरातल्या, समाजातल्या सर्वानी एकत्र येऊन सहजीवनाचा, समाजजीवनाचा अनुभव घ्यावा हा एकमेव उद्देश असतो. आपल्याकडे तर इतके मराठी सण आहेत की एक संपत नाही तर पुढच्या सणाची तयारी सुरू होते. आम्हीसुद्धा रंगपंचमी खेळून झाल्यावर लगेच संध्याकाळी गुढीपाडव्याची साडी खरेदी करण्यासाठी जातो. सणांनी अशा भरगच्च भरलेल्या वर्षामुळे दिवस अगदी पटापट निघून जातात आणि जगणं एकसुरी, कंटाळवाणं होत नाही. अशा वेळी मला प्रश्न पडतो की फुकाचं तत्त्वज्ञान झोडत सण साजरे न करणारे लोक कसे बरं जगत असतील? प्रत्येक सणाच्या आठवणी वेगळ्या असल्या तरी पुढे कित्येक वर्ष हेच सण साजरे होत राहतात. पण लग्नानंतरच्या पहिल्या सणांच्या आठवणी कपाटाच्या कोप-यात ठेवलेल्या अत्तराच्या कुपीप्रमाणे मनाच्या कोप-यात सदैव दरवळत राहतील,यात शंका नाही.

यापुढे येणारे काही सण आपण साध्या पध्दतीने करणार आहोत.तर काही सार्वजनिक सण पुढे ढकलले आहेत.तेव्हा नाराज न होता येणारे सणवार आपण परिस्थितीनुसार आंनदात साजरे करुया.    


Thursday, May 28, 2020

वाढदिवसाचा बदलता अंदाज....

                                  वाढदिवसाचा बदलता अंदाज....

वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक विशेष उत्साहाचा दिवस.मागच्या पन्नास पेक्षा जास्त दिवसात ब-याच मित्रांचे व त्यांच्या मुलांचे व त्यांच्या लग्नाचे वाढदिवस साजरे झाले.प्रत्येकजण त्याच्या वाढदिवसासाठी उत्सुक असतो. आपला वाढदिवस इतरांपेक्षा काहीतरी हटके असावा यासाठी आपण सगळेच प्रयत्न करीत असतो. परंतु लॉकडाऊनमुळे वाढदिवस साजरा करण्याची अनेकांची पद्धत बदलली आहे.लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली तरी झूम अँपद्वारे देशातील आणि परदेशातील मित्र व नातेवाईकांसोबत वाढदिवसाचा साजरा करण्याचा नवीन फंडा लोकांनी शोधून काढला आहे.घरात बनवलेला केक कापायचा व सर्व  मित्र-मैत्रीणी व नातेवाईकांच्या शुभेच्छा स्विकारायच्या.सोशल मिडियावर तर शुभेच्छांचा वर्षाव होतो.


वाढदिवसासारख्या महत्त्वाच्या दिवशी आपल्या माणसांची साथ आणि आशीर्वाद मिळणे महत्त्वाचे असते. मात्र लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच घरात राहणे बंधनकारक झाल्याने वाढदिवस साजरा करताना प्रत्येकालाच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आपली माणसं, नातेवाईक प्रत्यक्षात जरी भेटू शकत नसली तरी व्हर्च्युअली भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.वाढदिवसानिमित्त त्या व्यक्तीच्या घरात डिजिटल माध्यमामुळे शिरून त्यांचा आनंद द्विगुणित करणे शक्य आहे. त्यामुळे व्हिडिओ चॅट आणि ऑनलाइन माध्यमांच्याद्वारे एकमेकांना शुभेच्छा देऊन वाढदिवसाला तुम्ही प्रत्यक्षात जरी उपस्थित नसलात तरी अप्रत्यक्षरित्या उपस्थित राहू शकता.


लहान मुलं आपल्या वाढदिवसाची वाट पाहत असतात.त्यांना नवीन कपडे व नवीन खेळणी मिळतात.मित्रांकडून गिफ्ट मिळतात.पण या घरातील बंदिस्त काळात आपल्या कुटुंबातच मुलांचे वाढदिवस साजरे करावे लागल्याने लहान मुलं नाराज आहेत.तसेच ज्येष्ठ मंडळीचीही ऐशी व पंच्च्याहत्तरी अशी ऑनलाईन साजरे झाली.शुभेच्छा व आशिवार्द सर्व काही अप्रत्यक्षरीत्या झाले.इतरवेळी कामानिमित्त बाहेर असलेलं कुटुंब यावेळी आपल्यासोबत आहेत हेच आपले वाढदिवसाचे मोठे गिफ्ट असे समजून वाढदिवस उत्साहात साजरा केला गेला.आपला हा आनंदाचा क्षण घरातच एकमेकांच्या साथीने आपल्या हक्काच्या माणसांसोबत आनंदात साजरा  केला.खेळाडू,सिनेकलाकार व राजकारणी नेते मंडळीनी वाढदिवस न साजरा केले नाहीत.

करोनामुळे जगभर मोठं संकट पसरलेलं असताना अनेकांनी या काळात आपला वाढदिवस हा समाजहितासाठी साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे करोनाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना वाढदिवसाच्या दिवशी गरजूंना मदत करणे हा तुमच्यासमोरील उत्तम पर्याय शोधला.म्हणजेच गरजूंना खायला अन्न देण्यापासून ते त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यापर्यंत मदत इतरांना करू शकले. तसेच वाढदिवसाला कोणतीही आकर्षक वस्तू न घेता गिफ्ट म्हणून गोरगरिबांना मदत करु शकले.काहींना रक्तदान करून  स्वतःबरोबरीने इतरांच्याही चेहऱ्यावर आनंद पसरवता येऊ शकला. १० वर्षीय शाळकरी मुलीने तिचा वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहायता निधीला पाच हजार रुपयांची मदत केली आहे.

वाढदिवस दरवर्षी येतो, कौतुकाच्या वर्षावानं मन आनंदून जातं. पण कौतुक जसं आनंद देते, तशी जबाबदारीची जाणीवही करून देते. कौतुक आणि स्तुती जवाबदारी वाढवते.दिवसभर शुभेच्छांचे फोन, मेसेजेस सतत चालू होते. आपल्यावर लोक एवढे प्रेम करतात ही भावना ही खरोखरच सुख देणारी आहे. वाढदिवस वर्षातून फक्त एकदा येणारा असला तरीही तो प्रत्येकाला वर्षभर वाट पाहायला लावतो.याची जाणीव सतत होत असते.


वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.


Saturday, May 23, 2020

मातृदिन कायम आठवणीत राहील.

                                              मातृदिन कायम आठवणीत राहील.

परवाच मातृदिन झाला.आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.पण बरोबर त्याच दिवशी माझ्या आईची तब्तेत ठिक नसल्याने तिला मी व माझा लहान भाऊ इस्पितलात दाखल करण्यास घेऊन आलो होतो.इस्पितळात डॉक्टरने आईला तपासून  झाल्यावर इस्पितळात दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरु झाल्या. डॉक्टरने आम्हाला सर्व माहीती दिली.आईला व्हिलचेअर मध्ये बसवून आमच्या समोरून नेले.तिने आमच्याकडे पाहिले व हात दाखवला.त्याक्षणी आईला पाहून मला खूप वाईट वाटले.रडू येत होते.लॉकडाऊनच्या काळात इस्पितळाने केलेल्या नविन नियमानुसार आईला दाखल केल्यानंतर आम्हाला तिला भेटताही येणार नव्हते.त्यामुळे आईबद्दलची काळजी आणखी वाढली.कशी काय राहते? डॉक्टर आईवर जे उपचार करणार त्याची माहीती आम्हाला घरी फोनवर कळवणार होते.इस्पितळातली सर्व कामे पूर्ण करुन निघायच्या वेळी आईला फोनकरुन सर्व माहीती दिली.रुग्णालयातील सोयी विषयी माहीती घेतली.तिला धीर दिला.घरातील कोणीच तुला भेटणार नाही,याची कल्पना दिल्यावर तिचा आवाज गंभीर झाला.मी पण शांत झालो.मी स्वत:ला सावरत, तु लवकर बरी होऊन घरी येशील अशी शाश्वती दिल्यावर तिला आधार वाटला.मी व भाऊ घरी येण्यास निघालो.भावाला म्हणालो आज मातृदिन आहे.आपल्याला आईला इस्पितळात ठेवावे लागले.तोही थोडा वेळ शांत झाला.आईच्या काळजीत मातृदिन कधी गेला ते कळलेच नाही.चार दिवस इस्पितळात होती.त्या दिवसात आम्ही तिला भेटलो नाही.फक्त तिच्याकडे मोबाईल असल्याने मोबाईलवर तिची खुशाली घेत होतो.आता आईला घरी आणले आहे. तब्तेत सुधारत आहे. 
  

त्यादिवशी घरी आल्यावर सोशल मिडियावर मित्रांचे आईबरोबरचे फोटो पाहून आईची सारखी आठवण येत होती.सगळे आपल्या आईसोबत आहेत.मी मात्र आज आईला इस्पितलात ठेवून घरी आलो होतो. घरी असती तर आम्ही भावडांनी ऑनलाईन  मातृदिन साजरा केला असता.मी पण आईबरोबरचा फोटो अपलोड केला असता. सारखी तिची आठवण येत होती. काय करत असेल एकटीच इस्पितलात? कशी असेल? योग्य उपचार मिळत असतील का? काय खाल्ले असेल? झोप लागत असेल ना? असे बरेच प्रश्न सवावत होते. आईवरील प्रेम,तिच्या मायेची जाणीव सारखी होत होती.माझी आई माझ्यापासून लांब इस्पितळात उपचार घेत असल्याने मी तिला मातृदिन आठवण करुन दिली नाही.मी माझ्यामुलांसोबत नसल्याने तिला दु:ख झाले असते. 

अदल्याच दिवसापासून तिची तबतेत ठिक नव्हती.फॅमिली डॉक्टरने इस्पितलात दाखल करुन पुढचे उपचार करावे लागतील, असे सांगितले.लॉकडाऊनच्या व विषाणुच्या संसर्गाच्या दिवसात इस्पितळात दाखल न करता उपचार करु शकतो का? याची चौकशी दुस-या डॉक्टरांकडे केली.तिला इस्पितळात दाखल करावेच लागेल असे सगळ्यांचे मत होते.मग कोणत्या इस्पितळात उपचार घ्यायचे यावर चर्चा केली व तयारी करुन झोपलो.पण उद्याचा काळजीने आईला व मला रात्रभर झोप लागली नाही.

लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडण्याची भिती असताना आमच्यावर आईला इस्पितळात ठेवण्याची वेळ आली होती.ते दिवस कसे काढले ते आम्हालाच माहीत.आईची खूप काळजी वाटत होती. कसे काय होणार? पण देवाची कृपेने सर्वकाही व्यवस्थित झाले व ती सुखरुप घरी आली.ती चांगली ठणठणीत झाली व लॉकडाऊन उठले की आम्ही मातृदिन साजरा करणार आहोत.      

Monday, May 18, 2020

निसर्ग मोकळा श्वास घेताना दिसतोय

निसर्ग मोकळा श्वास घेताना दिसतोय


’निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे.निसर्ग आणि मानव यांचा संबंध अतुट आहे.निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे पण हल्ली मानवाने मैत्री कमी केली असल्याचे जाणवत आहे.हा संबंध बदलत्या काळाप्रमाणे बदलत आहे.मागच्या पन्नास दिवसात मनुष्य प्राण्याची निसर्गातली घुसखोरी कमी झाल्याने निसर्गात मोठा बदल झाला आहे.मनुष्य घरात बंदिस्त असल्याने शहरातील ऐंशी टक्के प्रदुषण घटल्याने सर्वत्र शांतता व आल्हाददायी वातावरण झाले आहे.हवा शुध्द व धुळमुक्त झाली आहे.नद्याचे पाणी स्वच्छ व निर्मळ झाले आहे.गुणवत्ता सुधारली आहे.प्राणी व पक्षी मुक्तपणे आंनदाने संचार करीत आहेत.प्राणी शहरात शिरले आहे.तर पक्षांची किलबिलाट ऐकायला मिळत आहे.वातावरण स्वच्छ व प्रसन्न झाले आहे.झाडे व वेली जोमाने वाढत आहेत.शेतातल्या पिकांनी जोर धरला आहे.पक्षी, मानव आदी सर्व घटकांचा समावेश निसर्ग या संकल्पनेत होतो. निसर्गाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. त्याचबरोबर मानवी जीवनाचादेखील निसर्गावर परिणाम होत असतो. निसर्गात मानव बदल घडवून आणतो. तसेच मानवी जीवनातदेखील निसर्गामुळे बदल घडत राहतो.निसर्ग निर्मळ झाल्याने मनुष्य प्राण्याचे आजारपण दूर झाले आहेत.पृथ्वीवरील पर्यावरणाचा, निसर्गाचा मानवाकडून सुरू असलेला र्‍हास थांबवण्यासाठी निसर्गानेच कोरोनारूपी अस्त्र मानवाच्या दिशेने भिरकावले असावे, असा मत व्यक्त होत आहे.


लॉकडाऊनमुळे सगळीकडेच वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे हवेतील प्रदूषण स्वाभाविकपणे खाली आलेच, पण त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणातही लगेचच जाणवेल इतकी घट झाली.देशात सध्या निव्वळ अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू असल्याने कित्येक कारखाने बंद आहेत. स्वाभाविकपणे कारखान्यांकडून होणारे वायू आणि नद्यांमधील प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटले आहे. लॉकडाऊननंतरच्या दुसर्‍या आठवड्यातच देशाच्या किनारपट्टीनजीकच्या भागात समुद्री जीवांचा वावर ठळकपणाने वाढलेला दिसू लागला. अनेक ठिकाणी डॉल्फिनसारखे मासे किनारपट्टीच्या आणखी समीप आले. मुंबईजवळ अरबी समुद्रातही हा बदल दिसला. ओझोन चा थर पुन्हा पूर्ववत झाला आहे.


 वाढत चाललेले ग्लोबल वॉर्मिंग यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे.प्रदुषणाने निसर्गाची मोठी हानी होत आहे.विकासाच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्याने हवामान बदल, जागतिक तापमान वाढ अशा मोठय़ा समस्यांनी डोके वर काढले आहे.यात जैवविविधतेचा ऱ्हास हा महत्त्वाचा मुद्दा आहे.निसर्गाचे वेळापत्रक बदलत आहे.औद्योगिकरणाच्या प्रवाहात आणि आधुनिकीकरणाच्या नादात क्षणिक लाभाकरिता मानवाकडून करण्यात येणारी अतोनात वृक्षतोड, त्यामुळे गतीने नष्ट होणारी वनसंपदा आपल्या सभोवतीचा पर्यावरणसमतोल बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे.कारखाने तसेच रासायनिक कारखान्यांतून निघणारा धूर तसेच विषारी द्रव्ये पाण्यात सोडल्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे.रस्ते बांधताना तोडलेल्या झाडांच्या दुप्पट झाडे लावली जात नाहीत.निसर्गाचा समतोल बिघडवण्यात आणि जमिनीच्या पोटातील पाण्याचा साठा संपवण्यात मानवाची मोठी भूमिका आहे.निसर्गाच्या नियमात मानवी हस्तक्षेप वाढला आणि जंगलातील प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले.  

आजच्या प्रगत वैज्ञानिक युगात मानवी समाजास निसर्गाच्या सान्निध्यात निर्दोष जीवन जगायचे असेल व इतरांना जगू द्यायचे असेल तर निसर्ग रक्षणाचे व पर्यावरण समतोलाचे मूलगामी कार्य माणसाला करावेच लागेल.

निसर्गातील या बदलांना तात्पुरतेच ठरवून इतिहासजमा करायचे की ते कायमस्वरूपी टिकावेत म्हणून पुढाकार घेऊन काही पावले टाकायची, याचा विचार अवश्य करावा लागेल.निसर्गाप्रतिची जागृकता वाढणे अधिक गरजेचे आहे.निसर्गाने आपल्याला जी संपत्ती दिली आहे ती आपल्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची आहे.

समृद्ध निसर्ग वाचवा.


Sunday, May 17, 2020

लागलेल्या सवयीचं काय?

                                              लागलेल्या सवयीचं काय?


पन्नास दिवसाच्या कालावधीत आपल्यात बरेच मोठे बदल घडले आहेत.घरात बंदीस्त झाल्याने काही सवयी दूर झाल्या तर काही सवयी नव्याने लागल्या आहेत.एखादी गोष्ट आपण सारखी करत राहिलो की आपल्याला त्या गोष्टीची सवय होत जाते.कोणताच कामधंदा नसल्याने व धावपळीचे जीवन थांबल्याने काही नवीन सवयी लागल्या आहेत.तर मागील काळातील बदललेल्या दिनक्रमाने काही सवयी दूर झाल्या आहेत.काही सवयी आपण लावून घेतो तर काही सवयी आपल्याला आपोपाप चिकटल्या जातात.आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर आपल्या शरीराला आणि मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. चांगल्या सवयी अंगी बाणवा आणि बघा तुमचे आयुष्य बदलेले असेल, असे म्हणतात.चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्या.प्रत्येक व्यक्तीला चांगल्या सवयीप्रमाणे काहीं वाईट सवयी असू शकतात.पण त्या दुस-यांनी सांगितल्या शिवाय आपल्या लक्षात येत नाहीत.सगळ्यांना कसली ना कसलीतरी सवय हि असतेच.सवय हि चांगलीही असू शकते.तशी वाईटही असू शकते.

चांगल्या सवयी :
घरातून कामे करु लागलो.शरीराला योगासने व व्यायामाची शिस्त लावली.ध्यान व चितंन करु लागलो.सात्विक व शाकाहारी अन्न खाण्य़ास शिकलो.खाण्याच्या वेळांच्या बाबतीत वक्तशीर झालो.मुलांना जास्त वेळ देऊ लागलो आणि विविध प्रकारचे खेळ खेळू लागलो. याने आमची बॉंडिंग खूप जास्त वाढली.गृहीणीना मदत करु लागलो.ज्येष्ठांची काळजी घेऊ लागलो.कुटुंबाला वेळ देवू लागलो.खर्च कमी करण्यास शिकलो.घरातल्या वस्तू आणू लागलो,नातेवाईकांनाशी संपर्क करु लागलो.वृतपत्र नसले तरीही बातम्यांचा आढावा घेऊ लागलो.व्यसने कमी झाली.घरातच ऐकट्याने व्यसन करु लागलो.घरातच चित्रपट व नाटक पाहू लागलो.संगीत,वाचण व लेखन सारखे वेगवेगळे छंद जोपासू लागलो.स्वभावात बरेच बदल झाले आहेत. शांतपणे रागावर नियंत्रण मिळवणे सोपे झाले आहे.साफ स्वच्छ राहण्याची जास्त प्रमाणात सवय लागली आहे.सोशल डिस्टन्सिंगची सवय लागली.पैसा नाही वेळ आणि नाती जपायला शिकलो.अशाच आणखी काही.

वाईट सवयी :
रात्री उशिरा झोपणे व उशिरा उठणे,अंगात आळस भराला आहे.डाएट वाढलंय. व्यसने वाढली आहेत.व्यायाम बंद केला.शाकाहारी अन्न खावून कंटाळा आला.महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.कौटुंबिक हिंसाचार वाढत आहे. एकटेपण व कैदी असल्याची भावना निर्माण झाली आहे.मोबाईल व  टीव्हीला नरजेआड करु शकत नाही.मंदिरात जाणे बंद झाले.रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं. ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.या सवयी वरकरणी अपायकारक वाटत नसल्या,तरी प्रत्यक्षात मात्र या सवयींचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात.वजन वाढले आहे.पासवर्ड विसरणे.अशाच आणखी काही. 

सवयीमुळे पडलेले प्रश्न :
धावत्या जीवनाला अचानक लागलेल्या ब्रेकमुळे व विषाणूच्या दहशतीमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. यात चिंता, भीती, एकटेपणा आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.पन्नास दिवसानंतर लागलेल्या सवयींचे काय होणार?ऑफिसला व शाळेला जाण्याची मानसिकता येईल का? रांगेने गाडीत चढता येईल का? प्रवासाचा त्रास झेपेल का?ऑफिसचे काम  पहिल्यासारखे जमेल का? ससंर्गाची भीतीने पहिल्यासारखे जीवन जगता येणार नाही.अशा परिस्थितीत नव्याने आपली दिनचर्या आखता येईल का?लागलेल्या सवयींमध्ये बदल करणे कठीण जाणार आहे.दिनचर्येत बदल झाल्याने समस्या उद्भवल्या आहेत.संसर्गाचा धोका, नोकरी आणि व्यवसायातील अनिश्चितता व आलेला एकटेपणा.  

शक्यतो सतत सकारात्मक निर्णयावर येण्याचा विचार करा.वाईट व त्रासदायक सवयी बदलण्याचा निर्धार करावा.धूम्रपानाची सवय जितकी वाईट तितकीच ती सोडण्यास कठीण आहे. धूम्रपानाचा परिणाम फक्त आपल्या शरीरावरच होत नाही तर मनावर आणि आपल्यासोबत राहणाऱ्या लोकांवरही होतो.धूम्रपान सोडण्याचा संकल्प करावा.मोबाइलचे व्यसन लावून घेऊ नका.निरोगी राहण्यासाठी  चांगले डाएट सुरू करावेत.जंक फूडपासून दूर रहा.सवयीचे गुलाम होऊ नका.जो मनाला जिंकतो तो सर्व काही जिंकू शकतो असे म्हणतात. म्हणूनच आपल्या सवयी आपल्या मानवर ताबा मिळवून द्यायला मदत करतील आणि आपले आयुष्य बदलतील.मानसिक
द्दष्ट्या कणखर बना.

चांगल्या सवयी लावणं कठीण असतं, असं म्हणतात. पण खरंतर हे सगळे केवळ मनाचे खेळ आहेत. एकदा आपण आपलं मन तयार केलं की सगळे प्रश्न दूर होतात. नकारात्मकता लवकर अंगी जडते पण सकारात्मकता जडायला थोडा वेळ जावा लागतो.


Tuesday, May 12, 2020

बालक पालक


                                                               बालक पालक 


ज्या पालकांची मुलं लहान आहेत.त्यांना लॉकडाऊनच्या काळात घरात बंदिस्त करुन संगोपन करणे कठिण काम आहे.अशा पालकांना माझा सलाम. थोरामोठ्यांना परिथितीचे गांभीर्य आहे.ते समजू शकतात.पण लहान मुलांना घरात डांबून ठेवणे म्हणजे त्यांना शिक्षा दिल्या सारखीच आहे.मुलांना शाळा नसून सुट्टी असल्याचा आंनद घरातच राहून घ्यावा लागत आहे.बाहेर फिरण्यास जाता येत नाही.मित्रमंडळींबरोबर खेळता येत नाही आणि नातेवाईकांना घरी बोलवता येत नाही.अशा कचाट्यात पालक सापडले आहेत.मुलांना घरातच ठेवून जगाशी संबध न आणता सुरक्षित ठेवणे म्हणजे पालकांची तारेवरची कसरत आहे.मुलांची जीवनशैली आणि आहाराची काळजी घ्यावी लागत आहे.त्यांना आजारपणापासून दूर ठेवावे लागत आहे.या मुलांना घरात थोपवणे पालकांना खूप कठिण जात असेल.त्यातच सर्व दक्षता घ्यावी लागत आहे.सारखे हात धुवावे लागत आहेत.पण त्यातच काही शाळा ऑनलाईन शिकवण्यास सुरुवात करीत आहेत.हा नवा गोंधळ सुरु झाला आहे.

कधीतरी स्वतःचं लहानपण आठवतं, तेव्हा बरेचदा आठवतात ती मित्रमैत्रिणींची लुटूपुटुची भांडणं. 'कट्टी बट्टी बाल बट्टी बारा महिने बोलू नको लिंबाचा पाला तोडू नको' - असं अगदी तावातावाने एकमेकांना म्हणणारे पुढच्या काही मिनिटातच पुन्हा एकत्र येऊन खेळायलाही सुरुवात करायचो. आता हे सगळं आठवताना गंमत वाटते आणि मग उमगत जातं की, आपण इतर माणसांशिवाय राहू शकत नाही.मुलं मित्रमैत्रिणीशिवाय जगू शकत नाहीत. 

किती छंद जोपासणार,टि.व्ही पाहणार,गेम खेळणार,गोष्टी सांगणार,पुस्तकं वाचणार,पत्ते व सापसिडी खेळणार,फोनवर बोलणार?मस्ती  करण्याच्या वेळी हे खेळ खेळण्यास त्यांना आवडत नाही.मस्ती करायला व खेळायला मित्रांना भेटता येत नाही ही एक लहान मुलांनासाठी मोठी शिक्षाच आहे.देवानी ही शिक्षा आम्हां लहान मुलांना का दिली? असा प्रश्न ती विचारत आहेत.शाळेतून घरी आल्यावर दप्तर टाकून बाहेर पळणारी मुलं घरातून बाहेर न पडता शांतपणे एकटीच खेळत आहेत. खिडकीतून किंवा गॅलरीतून त्याचा दोस्ताना ठिकवत आहेत.यावर्षी गांव किंवा सहलीला जाता येणार नसल्याने छोटी मंडळी नाराज झाली आहेत.तसेच उन्हाळी शिबीर नसणार आहेत.धम्माल,मौज मजा,मस्ती करण्याची  ऊन्हाळ्याची सुट्टी घरात काढावी लागत आहे.या मुलांसाठी नवीन खेळणी आणता येत नाही.त्यांच्या आवडीचे पदार्थ घरात बनवून त्यांना खाण्य़ास देता येतात.पण पिझा,बर्गर,आईस्क्रिम बंद असल्याने ही मंडळी नाराज आहेत.’यारे या सारे या, मजा करुया,मजा करुया’ हे हल्ली म्हणता येत नाही. 
           
यावर्षी शाळेचा शेवटचा दिवस साजराच झाला नाही.त्यामुळे काही मुलांना आपल्याला सुट्टी लागली आहे याची कल्पना देखील नाही.     मार्च, एप्रिल महिने सुरू झाले की विद्यार्थ्यांना वेध लागतात ते उन्हाळी सुट्टीचे. तर या सुट्टीच्या कल्पनेनं पालकांच्या पोटात गोळा उभा राहतो. "सुट्टी सुरू झाली की, मी हे करणार, ते करणार, अजिबात लवकर उठणार नाही, अभ्यासाचं तर नावही काढणार नाही," असं म्हणणारी मुलं यावर्षी आईबाबांच्या कुशीत शांत पडून आहेत.खरतर अशी सुट्टी म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात नव्यानं नातं निर्माण करण्याची एक संधी असते. त्यांच्याशी संवाद फुलवण्याचा प्रयत्न जर आपण पालकांनी केला तर मुलांना ते हवंच असतं. पण नोकरी व्यवसायामुळे ते प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण यावर्षी ह्या संधीचा पालकांनी योग्य उपयोग करुन मुलांना कोमेजून देऊ नये.त्यांच्या सोबत कायम राहून त्याचा एकटेपणा दूर केला पाहिजे.कळत नकळत तुमच्यात जे बॉंडींग तयार  होतं ते इतर कोणत्याही आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं.आपल्याच माणसांकडून शिकण्याचा, त्यांच्याशी मनसोक्त संवाद करण्याचा आणि घरातल्या अनोख्या समर कॅम्पचा अनुभव मुलांच्या कायमचा स्मरणात राहील.मुलांना ही सुट्टी आयुष्यभर लक्षात राहील.


एक मात्र चांगलं झालं मुलांना आपल्या पालकांबरोबर भरपूर वेळ घालवण्याची संधी मिळाली.आईवडीलांना मुलांना वेळ देता आला. 



Sunday, May 10, 2020

मंदिर

                                                                मंदिर


कधी वाटलं नव्हतं.देशातील सर्व मंदिर भक्तांसाठी बंद होतील.कोण कोणावर रुसले आहे.देव भक्तांवर की भक्त देवावर?देव तर भक्तांचा भुकेलेला असतो.देव भक्तांची वाट पाहत बसला नसेल ना?देव आणि भक्तांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. तरीही देवाला भक्तांपासून थोडा आराम पाहिजे होता.प्रत्येक भक्त दर्शनाला येताना इच्छा घेऊन येतो व जाताना माझ्या मनोकामना पूर्ण  करण्याचा आर्जव करीत जातो. देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी एकच गर्दी होत असे.मंगळवारी व संकष्टीला सिध्दिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त तासनतास रांगेत उभे राहतात.असेच सर्व देवस्थानातून भाविकांना देवाच्या दर्शनाला मोठा प्रवास करुन मग रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यावे लागते.पण हल्ली प्रत्येक भक्त आपल्या घरातून देवाचे स्मरण करीत दर्शन घेत आहेत.देव देव्हाऱ्यात आहे पण भक्ताला देवाचे दर्शन होत नाही.देवाच्या दर्शनाला भक्तगण व्याकुळ झालेला आहे.    


देशातील मंदिर,चर्च,मशिद,मठ,दर्गे व गुरुव्दारासह सर्व धर्मांची प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली आहेत.देव एकटाच मंदिरात बसला आहे.फक्त पुजारी रोज देवाची पुजा अर्चा करीत आहेत.सोशल मिडीयावर रोज देवाच्या आरत्यांचे थेट प्रक्षेपण पाहवयास मिळते व देवाचे छान दर्शन होते.या देवांच्या आरतीला मंदिरात कधीच थांबायला मिळाले नसते.पण संपूर्ण आरती लाखो भाविकांना आपल्या घरातून पहाण्याचा आंनद लुटता येतो.मन प्रसन्न होते.


इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील मंदिर बंद आहेत.दोन हजार वर्षांच्या मंदिराच्या इतिहासात कदाचित प्रथमच तिरुपती बालाजी मंदिरावर अशी वेळ आली आहे की, ब-याच दिवसांपासून भाविकांना प्रवेश निषेध केला आहे. यापूर्वी १९४१ मध्ये ब्रिटिशांनी ‘रामनवमी’ उत्सवात भाविकांसाठी शिर्डीचे साईमंदिर बंद ठेवलं होतं. कॉलरा आजाराची साथ पसरल्यामुळे त्यावेळी मंदिर पाच दिवस भक्तांसाठी बंद करण्यात आलं होतं. ७९ वर्षांपूर्वीच्या निर्णयाची पुनरावृत्ती झाली आहे.शनि शिंगणापूर येथील शनि महाराजांच्या मूर्तीचा चारशे वर्षांचा इतिहास सांगितला जातो. चारशे वर्षात कधीही मंदिर भक्तांसाठी बंद ठेवले गेलेले नाही असे येथील जाणकार सांगतात.तीनशे वर्षात पहिल्यांदाच नाशिकचे काळाराम मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात सुट्टयांमुळे सर्वच मंदिरात गर्दी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सर्व पर्यटनस्थळांसह तीर्थक्षेत्रे देखील ओस पडली आहेत.


शिर्डी साई बाबा संस्थानला दररोज जवळपास दीड कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान होत आहे.मंदिरांना मिळणा-या देणग्या बंद झाल्याने मंदिराचा अर्थसंकल्प बिधडणार आहे.मंदिर सुरु झाली तरीही तर भक्तगण दर्शनाला येण्यास बराच अवधी लागणार आहे.याचा परिणाम मंदिराच्या खर्चावर होणार आहे.   

घर हे देखील एक मंदिरच आहे, हेसुद्धा आपण विसरतो. देव सर्वत्र भरलेला आहे असे म्हणायचे आणि पदोपदी त्याचा अपमान करायचा अशी आपली वृत्ती बनली आहे आणि ती अत्यंत दुदैर्वी आहे. देवस्थानी, देवाच्या नावाने बकालपणा होत असेल, घाण आणि कचरा होत असेल, तर इतर ठिकाणी आपण काय आणि कसा गोंधळ घालतो हे तर सतत दिसतेच आहे.देवा या भक्तांना सद्बुद्धी दे!

मंदिर बंद आहेत.पण दवाखाने व रुग्णालये ही देवस्थाने झाली आहेत. तेथील अहोरात्र उपाचार करणारी मंडळी लोकांसाठी देव झाली आहेत.   



Friday, May 8, 2020

बातम्या



                                                                  बातम्या


टि.व्हीवरील बातम्या पाहून व ऐकून वीट आला आहे.हल्ली करोना शिवाय दुसरी कोणतीच बातमी नसते.शहरातील,राज्यातील,देशातील व जगातील करोनाचा संसर्गाच्याच बातम्या असतात. सुरुवातील दिवसभर माणसं कान देऊन बातम्या ऐकत असतं.चाळीस दिवसानंतर त्या बातम्यामध्ये काहीच रस न राहिल्याने कोणीच बातम्याचे चॅनल लावत नाहीत.काहींची तर वाढत्या करोना बाधितांचा आकडा व मृत्युदर पाहून भिती वाढत आहे.प्रथम करोनाच्या प्रसार कोणत्या भागात होत आहे ते पाहत होतो.पण नंतर सगळ्याच भागात करोनाचा प्रसार होत गेल्याने त्या बातम्यांमध्ये नाविन्य राहीले नाही.हल्ली मालिका बंद असल्याने कधीही बातम्या पाहण्यास आपल्या हातात रीमोट मिळतो.मालिका बंद झाल्याने फक्त बातम्या पाहण्यास टि.व्ही सुरु होतो. ’टीव्ही' आणि "सोशल मीडिया'वरूनही "कोरोना' विषयी सातत्याने "पॅनिक अटॅक' होताना दिसत आहे. यामुळेच एखाद्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ शकतात. हे टाळायचे, तर "कोरोना'च्या बातम्या बघणे बंद करा, असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी दिला आहे.


एक बरं आहे,वृत्तपत्रातून हा संसर्ग पसरण्याची शक्‍यतेमुळे वृतपत्र घरी येत नाहीत.त्या वृतपत्रातूनही करोनासंबधीतच बातम्या वाचाव्या लागल्या असत्या. करोनाने बातम्याचे वृतपत्रच बंद केले आणि बातम्या गोळा करणा-या पत्रकारांनाही देखील सोडले नाही.


लाखो प्रेक्षक दूरदर्शनवरील बातम्या विश्वसनीय मानतात.आपल्याकडे टीव्हीवरील बातम्या सर्वांत लोकप्रिय आहेत, कारण ते सर्वांत सहज उपलब्ध असलेलं माध्यम आहे.तिथं आपल्याला बातमी वाचावी लागत नाही. आपण टीव्हीसमोर बसून घरातली इतर कामं करत करत ती ग्रहण करू शकतो.वृत्तपत्रांमध्ये विविध भाग असतात, जसे एक पान राष्ट्रीय घडामोडी. एक पान आंतरराष्ट्रीय घडामोडी, एक पान आर्थिक घडामोडी व एक पान क्रीडाविषयक घडामोडींनी व्यापले असते.ज्याला ज्या बातम्यांमध्ये रस असतो त्याप्रमाणे बातम्या वाचल्या जातात.दैनंदिन वृत्तपत्रातल्या रोजच्या बातम्या वाचकाने वाचणे म्हणजे जगाची माहिती घेणे. ती त्याची गरज असते.बातम्यांची भाषा सर्वसामान्य माणसांना समजावी अशी सुस्पष्ट असावी.


‘आकाशवाणी, अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहेत,’ हे सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ चे चिरपरिचित वाक्य रेडियोवर ऐकू येत असे.रेडियोची टी.व्हीसमोर आपले अस्तिव टिकवण्यासाठी धडपडत सुरु आहे.हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक चॅनल बातम्या देण्यास तत्पर असतात.पहिल्यांदा बातमी दिली तर त्या चॅनेलला मोठेपणा मिळतो.मान मिळतो.याकरीता चॅनेलवाले व त्यांचे पत्रकार कायम बातम्यांच्या मागे असतात.आजकाल प्रत्येक मुद्रित तसेच दूरचित्रवाणी माध्यमाचे संकेतस्थळ हमखास पाहायला मिळते. .त्या संकेतस्थळवर ताज्या बातम्या प्रसिध्द केल्या जातात.त्यातील काही बातम्या दुस-या दिवशी वृतपत्रात वाचण्यास मिळतात. 

काही मर्यादित प्रमाणात वाचकांचा पत्रव्यवहार सोडल्यास मुद्रित माध्यम हे फक्त माहिती देणार्‍याच्या भूमिकेत दिसते. अग्रलेखासह प्रथितयश लेखकांचे स्तंभलेखन, विविध विषयांना वाहिलेल्या पुरवण्या, लेख एवढीच मर्यादा मते मांडण्याच्या बाबतीत होती. वेब माध्यमामध्ये मात्र ते वाचणारा-पाहणारा कुणीही तत्काळ आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतो. प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक मजकूर, व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवण्याची सोय असते. मग तो विषय किंवा बातमी कितीही छोटी असली तरी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करता येते.

वृत्तवाहिन्यांवरील अतिउत्साही प्रसारणापासून स्वत:ला आवरा, संवेदनशील घटनेचे वृत्त संकलन आणि प्रसारण अधिक जबाबदारीने करावे आणि कोणत्याही बातमीदारीत विश्वसनीयता असली पाहिजे.बहुतांश इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांनी तर सर्व प्रकारचे विधिनिषेध गुंडाळून ठेवले आहेत. समाजात अस्वस्थता माजवू शकतील, दुही निर्माण करू शकतील, कलहाचं वातावरण निर्माण करू शकतील असे विषय हेच फक्त बातमीच्या योग्यतेचे विषय असल्याप्रमाणे त्याचाच अहोरात्र मारा चालू असतो. आणि त्यांच्या दुर्दैवाने एखाद्या बातमीत सनसनीखेज काही नसलं, तरी तिला त्या पध्दतीने सादर करण्यात ही माध्यमं वाकबगार झाली आहेत. पार्श्वसंगीतापासून सादरीकरणापर्यंत सगळंच बटबटीत, अंगावर येईल असं, मेंदूला विचार करण्याची मुभा न देता तो बधीर होईल अशी बातम्यांची/चर्चांची गिरणी अव्याहत चालू ठेवणं म्हणजे पत्रकारितेचा धर्म निभावणं अशा समजुतीने हे सगळं चालू आहे.


लॉकडाऊन कधी संपणार या एकाच बातमीकडे सर्वजण कान लावून बसले आहेत.